जेवण बनवलं आणि ते संपूर्ण संपलं असं फार कधीतरी होतं. पण अनेकदा बनवलेल्या भाज्या उरतात. त्यामुळे आपण भाज्या फेकून देतो. बटाटे, कोबी, पनीर, भेंडी, घेवडा, वाटाणा किंवा इतर कोणतीही शिजवलेली भाजी खाल्ल्यानंतर घरात थोडीफार शिल्लक राहतेच. अनेक लोक ही शिल्लक भाजी खराब झाली आहे असं समजून दुसऱ्या दिवशी फेकून देतात किंवा पुन्हा खाणं टाळतात. पण जर भाजी व्यवस्थित साठवून वेळेवर वापरली, तर त्यापासून अनेक प्रकारचे स्वादिष्ट आणि नवीन पदार्थ बनवता येतात. यामुळे अन्नाची नासाडीच होत नाही आणि वेळ देखील वाचतो…
भाज्यांचा योग्य वापर केल्यास, प्रत्येक वेळी नवीन भाजी बनवण्याची गरज भासत नाही आणि काही मिनिटांतच एक स्वादिष्ट नाश्ता किंवा हलकं जेवण तयार होतं. मात्र, उरलेल्या भाज्या खराब झाल्या नसतील तरच त्यांचा वापर करा. तर जाणून घ्या, उरलेल्या भाज्यांपासून बनवल्या जाणाऱ्या 4 स्वादिष्ट पदार्थांबद्दल आणि त्यांचा वापर करताना लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टींबद्दल जाणून घ्या…
भरलेला पराठा : उरलेल्या सुक्या भाज्या हलक्याच वाटून घ्या आणि पिठाच्या मिश्रणात घोळवून पराठे बनवा. तव्यावर थोडं तूप किंवा तेल घालून ते चांगलं तळून घ्या. हा पराठा खूप चविष्ट लागतो आणि पोट बराच वेळ भरलेलं ठेवतो.
व्हेज सँडविच : उरलेल्या भाज्या ब्रेडच्या एका स्लाइसवर पसरवा. हवं असल्यास, त्यावर थोडं चीज किंवा पनीर घाला आणि ब्रेडच्या दुसऱ्या तुकड्याने झाकून टोस्ट करा. हा एक झटपट नाश्ता आहे, ज्यात भाज्यांमधील पोषक तत्वेही मिळतात आणि यासाठी मसाल्यांची वेगळी तयारी करण्याची आवश्यकता नसते.
व्हेज सॅलड : बेसनाची पेस्ट तयार करून त्यात उरलेल्या भाज्या घाला आणि तव्यावर चिला बनवा. तो हिरव्या चटणीसोबत किंवा दह्यासोबत खाल्ला जाऊ शकतो. हे प्रथिने आणि भाज्यांचे एक उत्तम मिश्रण आहे, जे नाश्त्यासाठी एक आरोग्यदायी पर्याय ठरते.
उरलेल्या भाज्या वापरण्यापूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?
उरलेल्या भाज्या खोलीच्या तापमानावर जास्त वेळ ठेवू नका. त्या थंड झाल्यावर, एका स्वच्छ, हवाबंद डब्यात ठेवून फ्रिजमध्ये ठेवा. 1 ते 2 दिवसांच्या आत त्या वापरण्याचा प्रयत्न करा. जर भाजीला विचित्र वास येत असेल, भाजीचा रंग बदलला असेल किंवा तिला बुरशी लागलेली दिसत असेल, तर ती अजिबात खाऊ नका. भाजी खराब झाली आहे की नाही. याची पूर्ण आधी खात्री करुन घ्या…