आता देश वाचवायची वेळ… सुप्रिया सुळे यांचे मोठे विधान, सरकारवर जोरदार टीका, म्हटले.. – Marathi News | MP Supriya Sule has criticized the government over the issues of inflation and unemployment


राष्ट्रवादीच्या विलीनीकरण्याच्या मुद्द्यावर नुकताच खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठे विधान केले. सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, विलीनीकरणाबाबतत आम्हाला कुणीच संपर्क केलेला नाही. राजकीय पक्षातले लोक कामांसाठी एकमेकांना भेटत असतात. ममता बनर्जी आणि सोनिया गांधी यांच्यात जी भेट झाली, त्यात नक्की काय चर्चा झाली, याबाबत मला माहिती नाही. कोण कोणाच्या संपर्कात आहे, हे मला माहिती नाही. शरद पवार यांच्याकडे कुठलाही प्रस्ताव आला नाही. ना शरद पवारांनी कोणाला प्रस्ताव दिलाय. एक खरी गोष्ट सांगते, सध्या देशाची सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती इतकी खराब आहे की, आता राजकारण करण्याची वेळ नाहीये. आता देश वाचवायची वेळ आलेली आहे. महागाई, बेरोजगारी आणि प्रचंड भष्टाचार.. आता एकमेकांना तु तु मैं मैं करत बसायचं की, नीट परीक्षेमधील मुलांचे भविष्य बघायचे.

सत्ताधारी आणि विरोधकांनी तु तु मैं मैं करायची की, आज, महागाई बेरोजगारीमध्ये अडचणीत आलेला प्रत्येक शेतकरी असेल किंवा नागरिक असेल त्याला आधार द्यायचा. आमच्याही काही जबाबदाऱ्या आहेत. लोकांनी आम्हाला विश्वासाच्या नात्याने धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी आणलंय. घर फोडा, पक्ष फोडा असले उद्योग आम्ही केलेले नाहीत आणि कधी करणारही नाहीत.

पहिले शिवसेनेवर हल्ला झाला मग राष्ट्रवादीवर झाला आता तो हल्ला तुमुलवर होतो आहे. रोहित पवार यांच्या आंदोलनावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, मी रोहित पवार यांना सुरूवातीपासून विनंती करत होते की, तू असे उपोषण करू नको. आपली मोठी लढाई आहे. अतिशय असंवेदनशिल हे सरकार आहे. त्यांच्याशी लढायला आपण आपली ताकद ही ठेवलीच पाहिजे.

त्याची अस्था, प्रेम शेतकऱ्यांवरच म्हणून त्याने ठरवले होते की, तो हे करणार काल रात्रीही मी त्याच्याशी बोलले. काल दिवसभर तो ताकदीने लढत होता. पण आज सकाळी मी आढावा घेतला 24 तास झाले त्याने काही अन्न घेतले नाही आणि प्रचंड उन्हाळा आहे पण शेतकऱ्यांना न्याय मिळवण्याकरिता रोहित मोठा लढा उभा करत आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *