Lord Shiv: भगवान शंकरांना ‘ही’ फुले अत्यंत प्रिय! मात्र ‘हे’ एक फूल चुकूनही शिवलिंगाला अर्पण करू नका, कमी लोकांना माहित, धार्मिक महत्त्व…


यंदा श्रावण महिना 13 ऑगस्ट २०२६ रोजी सुरू होणार आहे. या महिना भगवान शंकरांना समर्पित आहे, या काळात भगवान शिवांची विशेष पूजा केली जाते. आज आपण सविस्तरपणे जाणून घेऊया की कोणती फुले भगवान शिवाला प्रिय आहेत आणि कोणती फुले त्यांना अर्पण करू नये...

यंदा श्रावण महिना 13 ऑगस्ट २०२६ रोजी सुरू होणार आहे. या महिना भगवान शंकरांना समर्पित आहे, या काळात भगवान शिवांची विशेष पूजा केली जाते. आज आपण सविस्तरपणे जाणून घेऊया की कोणती फुले भगवान शिवाला प्रिय आहेत आणि कोणती फुले त्यांना अर्पण करू नये…

श्रावण महिना लवकरच सुरू होतोय. हा भगवान शिवाच्या भक्तीमध्ये स्वतःला लीन करण्याचा महिना आहे. या संपूर्ण महिन्यात शिवमंदिरांमध्ये भक्तांची गर्दी असते. जलाभिषेक आणि रुद्राभिषेकापासून ते बेलपत्र, धोतरा, भांग आणि फुलांसह अनेक गोष्टी अर्पण करण्याची प्रथा आहे. धार्मिक श्रद्धेनुसार, काही विशिष्ट फुले भगवान शिवाला विशेष प्रिय आहेत. भगवान शिवाच्या आवडत्या फुलांविषयी सविस्तरपणे जाणून घेऊया, असे केल्याने श्रावण महिन्यातील भगवान शिवाची उपासना पूर्ण होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

श्रावण महिना लवकरच सुरू होतोय. हा भगवान शिवाच्या भक्तीमध्ये स्वतःला लीन करण्याचा महिना आहे. या संपूर्ण महिन्यात शिवमंदिरांमध्ये भक्तांची गर्दी असते. जलाभिषेक आणि रुद्राभिषेकापासून ते बेलपत्र, धोतरा, भांग आणि फुलांसह अनेक गोष्टी अर्पण करण्याची प्रथा आहे. धार्मिक श्रद्धेनुसार, काही विशिष्ट फुले भगवान शिवाला विशेष प्रिय आहेत. भगवान शिवाच्या आवडत्या फुलांविषयी सविस्तरपणे जाणून घेऊया, असे केल्याने श्रावण महिन्यातील भगवान शिवाची उपासना पूर्ण होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

भगवान शिवाची आवडती फुले - धोतऱ्याचे फूल भगवान शंकरांना सर्वाधिक प्रिय मानले जाते. पौराणिक कथांनुसार, समुद्रमंथनातून निघालेले हलाहल विष भगवान शिवांनी प्राशन केले होते. त्यानंतर त्यांच्या पूजेत धोतरा अर्पण करण्याची परंपरा सुरू झाली, अशी धार्मिक मान्यता आहे. त्याचप्रमाणे रुईची (आक) फुले आणि पानेही शिवपूजेत विशेष महत्त्वाची मानली जातात. ही फुले वैराग्य, साधेपणा आणि तपश्चर्येचे प्रतीक मानली जातात.

भगवान शिवाची आवडती फुले – धोतऱ्याचे फूल भगवान शंकरांना सर्वाधिक प्रिय मानले जाते. पौराणिक कथांनुसार, समुद्रमंथनातून निघालेले हलाहल विष भगवान शिवांनी प्राशन केले होते. त्यानंतर त्यांच्या पूजेत धोतरा अर्पण करण्याची परंपरा सुरू झाली, अशी धार्मिक मान्यता आहे. त्याचप्रमाणे रुईची (आक) फुले आणि पानेही शिवपूजेत विशेष महत्त्वाची मानली जातात. ही फुले वैराग्य, साधेपणा आणि तपश्चर्येचे प्रतीक मानली जातात.

सुगंधी, सात्त्विक फुले - पांढरे कमळ हे पवित्रता आणि आध्यात्मिक ज्ञानाचे प्रतीक असल्यामुळे तेही भगवान शिवांना अर्पण केले जाते. जाई, जुई आणि चाफा यांसारखी सुगंधी, सात्त्विक फुलेही शिवपूजेसाठी शुभ मानली जातात. अनेक भागांत कण्हेर आणि नागकेशराची फुलेही श्रद्धेने अर्पण केली जातात.

सुगंधी, सात्त्विक फुले – पांढरे कमळ हे पवित्रता आणि आध्यात्मिक ज्ञानाचे प्रतीक असल्यामुळे तेही भगवान शिवांना अर्पण केले जाते. जाई, जुई आणि चाफा यांसारखी सुगंधी, सात्त्विक फुलेही शिवपूजेसाठी शुभ मानली जातात. अनेक भागांत कण्हेर आणि नागकेशराची फुलेही श्रद्धेने अर्पण केली जातात.

बेलपत्राचे महत्त्व -  भगवान शंकरांच्या पूजेत फुलांपेक्षा बेलपत्राला अधिक महत्त्व दिले गेले आहे. शिवलिंगावर तीन दलांचे बेलपत्र अर्पण केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. याशिवाय गंगाजल, कच्चे दूध, मध, दही, भस्म आणि ऊसाचा रस अर्पण करण्याचीही परंपरा आहे.

बेलपत्राचे महत्त्व – भगवान शंकरांच्या पूजेत फुलांपेक्षा बेलपत्राला अधिक महत्त्व दिले गेले आहे. शिवलिंगावर तीन दलांचे बेलपत्र अर्पण केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. याशिवाय गंगाजल, कच्चे दूध, मध, दही, भस्म आणि ऊसाचा रस अर्पण करण्याचीही परंपरा आहे.

एक फूल भगवान शंकरांना अर्पण करू नये - काही धार्मिक मान्यतांनुसार भगवान शिवांना केतकी (केवडा) आणि चंपा ही फुले अर्पण करणे टाळावे, असे सांगितले जाते. यामागे शिवपुराणातील काही पौराणिक कथा सांगितल्या जातात. मात्र, या परंपरा प्रदेश, संप्रदाय आणि कुटुंबाच्या धार्मिक रितीरिवाजांनुसार बदलू शकतात.

एक फूल भगवान शंकरांना अर्पण करू नये – काही धार्मिक मान्यतांनुसार भगवान शिवांना केतकी (केवडा) आणि चंपा ही फुले अर्पण करणे टाळावे, असे सांगितले जाते. यामागे शिवपुराणातील काही पौराणिक कथा सांगितल्या जातात. मात्र, या परंपरा प्रदेश, संप्रदाय आणि कुटुंबाच्या धार्मिक रितीरिवाजांनुसार बदलू शकतात.

धार्मिक श्रद्धेनुसार, भगवान शिवाला केतकीची फुले अर्पण करण्यास मनाई आहे. आख्यायिकेनुसार, केतकीच्या फुलांना शाप आहे आणि ही फुले भगवान शिवाला अर्पण केल्याने ते क्रोधित होतात. पूजेच्या वेळी कोमेजलेली, तुटलेली, शिळी किंवा गळून पडलेली फुले अर्पण करू नका.

धार्मिक श्रद्धेनुसार, भगवान शिवाला केतकीची फुले अर्पण करण्यास मनाई आहे. आख्यायिकेनुसार, केतकीच्या फुलांना शाप आहे आणि ही फुले भगवान शिवाला अर्पण केल्याने ते क्रोधित होतात. पूजेच्या वेळी कोमेजलेली, तुटलेली, शिळी किंवा गळून पडलेली फुले अर्पण करू नका.

धार्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर भगवान शंकरांना कोणते फूल अर्पण केले यापेक्षा ते श्रद्धा, भक्तिभाव आणि शुद्ध मनाने अर्पण केले आहे का, याला अधिक महत्त्व दिले गेले आहे. म्हणूनच भक्ती, नम्रता आणि प्रामाणिक भावनेने केलेली पूजा हीच भगवान शिवांना सर्वाधिक प्रिय मानली जाते.

धार्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर भगवान शंकरांना कोणते फूल अर्पण केले यापेक्षा ते श्रद्धा, भक्तिभाव आणि शुद्ध मनाने अर्पण केले आहे का, याला अधिक महत्त्व दिले गेले आहे. म्हणूनच भक्ती, नम्रता आणि प्रामाणिक भावनेने केलेली पूजा हीच भगवान शिवांना सर्वाधिक प्रिय मानली जाते.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Published at : 28 Jul 2026 01:34 PM (IST)

भविष्य फोटो गॅलरी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *