तुमच्यासारख्या नेत्यांमुळेच… खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या मुलाचा ठाकरे गटातील नेत्यावर संताप, थेट.. – Marathi News | Shiv Sena MP Nagesh Patil Ashtikar son Krishna Ashtikar criticized Sushma Andhare


शिवसेना ठाकरे गटाला सोडून 6 खासदार शिवसेना शिंदे गटात जात आहेत. त्यांनी वेगळ्या गटाचे पत्रही लोकसभा अध्यक्षांना दिले. शिवसेना ठाकरे गटाला तब्बल 6 खासदार सोडून जात असल्याने राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला. तब्बल 6 खासदारांनी बंडखोरी केल्याने मोठा झटका बसला. 19 जूनला हे खासदार शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे, तशी सूत्रांची माहिती आहे. व्हिप जारी करूनही हे खासदार बैठकीला उपस्थित राहिले नसल्याने यांना पक्षाकडून नोटीस पाठवण्यात आली. 7 दिवसांच्या आत या खासदारांना पक्षाच्या नोटीसला उत्तर द्यावे लागणार आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून 6 खासदारांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. मात्र, हे खासदार बंडखोरीवर ठाम आहेत. राजस्थानमध्ये हे खासदार असल्याचे सांगितले जाते. अज्ञातस्थळी हा खासदारांना हलवण्यात आले. एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे या खासदारांच्या संपर्कात आहेत.

या 6 खासदारांच्या यादीत हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्याही नावाचा समावेश आहे. नागेश पाटील यांनीही शिवसेना ठाकरे गटाविरोधात बंडखोरी केली. नागेश पाटील आष्टीकर यांचा मुलगा कृष्णा आष्टीकर हा उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून विधान परिषदेची निवडणूक लढत आहे. त्याला पक्षाकडून तिकिट देण्यात आले. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे सतत नागेश पाटील आष्टीकर यांच्यावर टीका करत आहेत.

अखेर कृष्णा आष्टीकर यांनी सुषमा अंधारे यांच्याकडून होणाऱ्या टीकेवर उत्तर दिले. वृत्तवाहिनीसोबत बोलताना त्यांनी सुषमा अंधारे यांनी केलेल्या टीकेवर पहिल्यांदाच भाष्य केले. कृष्णा आष्टीकर यांनी म्हटले की, मी उद्धव ठाकरे यांचा माणूस आहे आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत आहे. मी सुषमा अंधारे यांना उत्तर देण्यास बांधील नाही. मी उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहे.

ज्यादिवशी नागेश पाटील आष्टीकर यांचा फोन बंद झाला, त्यादिवसापासून माझे त्यांच्यासोबत बोलणे झाले नाही. सुषमा अंधारे यांनी पार आमच्या खानदानाचा उद्धार केला. मला खूप वाईट वाटले. मुळात म्हणजे वडील एका पक्षात आणि मुलगा दुसऱ्या पक्षात हे समीकरण काही नवीन नाही. माझे वडील अजून तिकडे गेले का? यांना कसली नेमकी घाई आहे, हेच कळत नाही. अशा नेत्यांमुळेच त्यांना वीट आल्याचेही कृष्णा आष्टीकर यांनी म्हटले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *