भारतातील ही 5 सुंदर शहरे फोटोग्राफी प्रेमींसाठी आहेत स्वर्ग, कसे पोहोचायचे? – Marathi News | These 5 beautiful cities in India are great places for photography lovers know how to reach them


आपला भारत देश केवळ संस्कृती आणि चविष्ट खाद्यपदार्थांसाठीच नव्हे, तर नैसर्गिक सौंदर्यासाठी आणि ऐतिहासिक वास्तूंसाठी खुप प्रसिद्ध आहे. आपल्या भारतात अशी काही शहरं आहेत जेथे संपूर्ण वस्त्या या निळ्या रंगाने रंगवलेले आहेत, तर काही जुन्या फ्रेंच-शैलीतील इमारती आहेत ज्या पाहिल्यावर एखाद्या परदेशी ठिकणी आल्यासारख्या वाटते. यामुळेच प्रवासी आणि फोटोग्राफर्स या रंगीबेरंगी ठिकाणांकडे अधिकाधिक आकर्षित होत आहेत.

तुम्ही जर एखाद्या शांत आणि सुंदर ठिकाणी फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर भारतातील ही रंगीबेरंगी गावे आणि शहरे तुमच्यासाठी योग्य ठिकाणे ठरू शकतात. येथील रस्ते, घरे, डोंगराळ भाग आणि संस्कृती प्रत्येक फोटोला खास बनवतात. चला भारतातील अशा पाच सुंदर ठिकाणांबद्दल जाणून घेऊयात.

1. जोधपूर – भारताचे प्रसिद्ध निळे शहर

राजस्थानमधील जोधपूर हे शहराला भेट देताच तुम्ही संपुर्ण परिसर पाहतच राहाल. कारण तेथील संपुर्ण घरे ही निळ्या रंगाने रंगवलेली आहेत. निळ्या रंगांच्या घरांसाठी हे ठिकाणं जगभर ओळखले जाते. मेहरानगड किल्ल्याच्या आजूबाजूचे रस्ते निळ्या घरांनी भरलेले आहेत. सूर्यप्रकाशात चमकणाऱ्या या निळ्या भिंती खरोखरच मनमोहक दिसतात.येथील अरुंद गल्ल्या आणि राजस्थानी वास्तुकला फोटोग्राफीसाठी बॅकग्राउंडकरिता एक उत्तम ठिकाणं आहे.

येथे कसे पोहोचावे: जोधपूर शहराचे स्वतःचे विमानतळ आणि रेल्वे स्टेशन आहे. दिल्ली, जयपूर आणि मुंबई येथून रेल्वे आणि विमानांची सोय सहज उपलब्ध आहे.

2. जयपूर – गुलाबी रंगात रंगलेले शाही शहर

जयपूरला गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते. येथील जुन्या इमारती आणि बाजारपेठा गुलाबी रंगाने रंगवलेल्या असल्यामुळे त्याला एक राजेशाही रूप प्राप्त होते. हवा महल, सिटी पॅलेस आणि जुन्या बाजारपेठा खरोखरच मनमोहक आहेत.

या ठिकाणी कसे पोहोचावे: जयपूर रेल्वे आणि विमान प्रवास या मार्गाने जयपूर शहरात जाऊ शकता.

3. पाँडिचेरी – पांढऱ्या आणि पिवळ्या रस्त्यांचे फ्रेंच शहर

पाँडिचेरी येथील फ्रेंच कॉलनी तिच्या सुंदर पांढऱ्या आणि फिकट पिवळ्या रंगाने रंगलेल्या इमारतींसाठी खुप प्रसिद्ध आहे. येथील शांत रस्ते, कॅफे आणि समुद्राकिनारी दिसणारी दृश्ये युरोपीय वातावरण निर्माण करतात. या ठिकाणचे प्रत्येक रस्ते पाहताच क्षणी फोटो काढण्याची इच्छा होते.

येथे कसे पोहोचावे: पाँडिचेरी चेन्नईपासून अंदाजे 3 ते 4 तासांच्या अंतरावर असून, तिथे बस, टॅक्सी आणि ट्रेनने सहज पोहोचता येते.

4. गोकर्ण – निळ्या आणि पांढऱ्या रंगांच्या छटा असलेले एक शांत समुद्रकिनारी गाव.

कर्नाटकातील गोकर्ण हे आपल्या शांत समुद्रकिनाऱ्यांसाठी आणि निळ्या-पांढऱ्या रंगाच्या कॅफे व घरांसाठी प्रसिद्ध होत आहे. येथे गोव्याइतकी गर्दी नसते, त्यामुळे शांतताप्रिय प्रवासी आणि फोटोग्राफीसाठी हे एक लोकप्रिय ठिकाण बनले आहे. समुद्रकिनाऱ्यावरील सूर्यास्त पाहणे एक मनमोहक क्षण असतो.

येथे कसे पोहोचावे: सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन गोकर्ण रोड आहे. गोवा आणि बंगळूरहून बस आणि टॅक्सी सहज उपलब्ध आहेत.

5. खोनोमा – हिरवळ आणि पांढरी घरे असलेले एक सुंदर गाव

नागालँडमधील खोनोमा गाव हे ‘ग्रीन व्हिलेज’ म्हणून ओळखले जाते. येथील पारंपरिक पांढरी घरे आणि हिरवीगार वनराई या गावाला खरोखरच अद्वितीय बनवते. हे निसर्गप्रेमी आणि सांस्कृतिक शौकिनांसाठी एक स्वर्ग आहे. येथील स्वच्छ रस्ते आणि पर्वतांची दृश्ये फोटोग्राफर्संसाठी एक पर्वणी ठरतात.

येथे कसे पोहोचावे: सर्वात जवळचे शहर कोहिमा आहे, जिथून टॅक्सीने खोनोमा येथे सहज पोहोचता येते.

भारतातील ही रंगीबेरंगी गावे आणि शहरे केवळ भेट देण्याची ठिकाणे नाहीत, तर ती आठवणी आणि सुंदर फोटो काढण्यासाठीचे खजिना देखील आहेत. जर तुम्ही तुमच्या पुढच्या प्रवासात काहीतरी अद्वितीय आणि नेत्रदीपक शोधत असाल, तर तुमच्या प्रवासाच्या यादीत या ठिकाणांचा नक्की समावेश करा.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *