नवी दिल्ली : टीम इंडियाचा युवा खेळाडू वैभव सूर्यवंशीनं इंग्लंडमध्ये आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. वैभवनं इंग्लंड दौऱ्यात तीन टी 20 सामने खेळले होते. या तीन सामन्यांमध्ये वैभव सूर्यवंशीला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आलं होतं. जोफ्रा आर्चरनं वैभव सूर्यवंशीला दोन वेळा बाद केलं होतं. यानंतर वैभव सूर्यवंशीवर तो शॉर्ट बॉलचा सामना करु शकत नाही अशी टीका केली सुरु केली होती. वैभवला खूप शिकण्याची गरज आहे, असं देखील म्हटलं जात होतं. आता वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन यानं मतं मांडली आहेत. वैभव सूर्यवंशीचं कौतुक करताना अश्विन म्हणाला की इतक्या कमी सामन्यांच्या आधारे कोणाची क्षमता तपासली जाऊ शकत नाही.
अश्विन वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ मैदानात
रविचंद्रन अश्विन यानं वैभव सूर्यवंशीबद्दल बोलताना म्हटलं की ऑस्ट्रेलियाचा महान खेळाडू रिकी पाँटिंग देखील त्याच्या शानदार करिअरमध्ये शॉर्ट बॉलवर बाद झाला होता. अश्विन म्हणाला की प्रत्येक खेळाडू काही कौशल्य आणि काही त्रुटी होत्या. सूर्यवंशी आता जागतिक स्तरावरील गोलंदाजांसमोर खेळणं शिकत आहे. यामुळं काही आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या जोरावर त्याचं परीक्षण करणं योग्य नाही.
रविचंद्रन अश्विन म्हणाला की 15 वर्षांच्या खेळाडूंवर अपेक्षांच्या ओझ्यामुळं अनावश्यक दबाव वाढत आहे. वैभव सूर्यवंशीमध्ये कोणताही बदल झाला नव्हता. त्याला स्वत:ला वेगळं दाखवण्याची गरज नाही. लोकांकडून शॉर्ट बॉलचा मुद्दा बाहेर काढला जात होता. रिकी पाँटिंग शॉर्ट बॉलवर बाद झाला नव्हता का? अश्विन म्हणाला की प्रत्येक खेळाडूची ताकद आणि कमजोरी वेगवेगळी असते.
वैभवच्या झिम्बाब्बेतील कामगिरीचं कौतुक
इंग्लंडमध्ये टी 20 करिअरमध्ये वैभव सूर्यवंशीला मोठी खेळी करण्यात अपयश आलं होतं. तर, झिम्बाब्वेत वैभव सूर्यवंशीनं दमदार कामगिरी केली होती. वैभवनं तीन सामन्यांमध्ये 151 धावा केल्या त्यामुळं प्लेअर ऑफ द सिरीज पुरस्कार देखील मिळाला.
अश्विन पुढं म्हणाला की झिम्बाब्वेत खेळपट्टी स्लो होती आणि बॉल स्पिन होत होता. वैभवनं त्यासोबत चांगला ताळमेळ बसवला. तिथं त्याचा स्ट्राइक रेट कमी होता, मात्र तो त्यांना चांगलं हिट करत होता. वैभव सूर्यवंशीला वेळ देण्याची गरज असल्याचं देखील रविचंद्रन अश्विन यानं म्हटलं.
वैभव सूर्यवंशीनं सातत्यानं चांगली कामगिरी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. क्रिकेटमध्ये चढ उतार येतात. वैभव क्रिकेट आणि वैयक्तिक आयुष्यात चांगली कामगिरी करेल, अशी अपेक्षा वैभव सूर्यवंशीनं व्यक्त केली.