भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात टी-20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना आज रंगणार आहे. आता भारतीय संघ ही मालिका जिंकण्यासाठी अतोनात प्रयत्न करतील. भारतीय संघाने मागील दोन टी-20 मालिका गमावल्या आहेत. आता या मालिकेसाठी भारतीय संघ विशेष प्रयत्न करतील आणि मालिका जिंकण्याच्याचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवतील. या मालिकेतही विशेष लक्ष हे वैभव सूर्यवंशीकडे असणार आहे. भारतीय क्रिकेट संघात पदार्पण करणाऱ्या वैभव सूर्यवंशीची इंग्लंड दौऱ्यात कामगिरी चांगली झाली नाही. यामुळे तो दबावाखाली आला आहे. आता त्याला झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी- 20 मालिकेत संधी दिली मिळाली तर तो, तिथे मोठी खेळी करून स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करेल. जर वैभव सूर्यवंशीने या सामन्यात मोठी खेळी केली, तर तो विश्वविक्रमही प्रस्थापित करू शकतो.
झिम्बाब्वेविरुद्धच्या टी- 20 मालिकेत संजू सॅमसन भारतीय संघात नाही. त्यामुळे, वैभव सूर्यवंशीला तिन्ही सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळू शकते. जर सूर्यवंशीने टी-20 मालिकेत 11 उत्तुंग षटकार मारले, तर तो इतिहास रचू शकतो. वैभवने आतापर्यंत 37 टी-20 सामने खेळले असून, त्यात त्याने 139 मोठे षटकार ठोकले आहेत. जर त्याने पुढच्या तीन सामन्यांमध्ये आणखी 11 षटकार मारले, तर तो अवघ्या 40 सामन्यांमध्ये 150 षटकारांचा टप्पा गाठेल. असे करणारा तो पहिला फलंदाज ठरू शकतो. सध्या हा विक्रम युएईचा स्फोटक फलंदाज मोहम्मद वसीमच्या नावावर आहे. त्याने 66 डावांमध्ये 150 षटकार पूर्ण केले होते. वैभवकडे एक नवीन विक्रम प्रस्थापित करण्याची सुवर्णसंधी आहे. या यादीत सध्या वेस्ट इंडिजचा एव्हिन लुईस दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर दिग्गज ख्रिस गेल तिसऱ्या क्रमांकावर आहे.
19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना हरारे येथे खेळला गेला होता, जिथे वैभव सूर्यवंशीने 175 धावांची शानदार खेळी केली होती. त्यामुळे, त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपले पहिले अर्धशतक याच मैदानावर करायला आवडेल. जर वैभव सूर्यवंशीने या मालिकेत चांगली कामगिरी केली, तर आशियाई खेळांसाठीच्या अंतिम 11 खेळाडूंमध्ये त्याचे स्थान असू शकते. जर त्याने या मालिकेत धावा केल्या नाहीत, तर त्याला संघातून वगळले जाण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. इंग्लंड दौऱ्यावरून परतल्यापासून सूर्यवंशीने आपल्या फलंदाजीवर मोठ्या प्रमाणावर काम केले आहे.