Latur Food Safety Action : लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथून अन्नपदार्थ विक्रेत्यांचे धाबे दणाणून सोडणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. रेणापूर येथील प्रसिद्ध ‘बेंगलोर अय्यंगार्स बेकरी’वर लातूरच्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी थेट धाड टाकत एक मोठी आणि धडक कारवाई केली आहे. या धडक कारवाईमुळे रेणापूर परिसरातील आणि संपूर्ण जिल्ह्यातील अन्नपदार्थ विक्रेत्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
रेणापूरमधील महात्मा गांधी चौक भागात ही बेकरी कार्यरत होती. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या पथकाने जेव्हा या बेकरीत अचानक पाऊल ठेवले, तेव्हा तिथली भीषण परिस्थिती पाहून स्वतः अधिकारीही चक्रावून गेले. बेकरीच्या आत अत्यंत गलिच्छ आणि कमालीच्या अस्वच्छ वातावरणात ग्राहकांसाठीचे अन्नपदार्थ बनवले जात असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनाने आले.
Latur Bakery FDA Inspection : मुदतबाह्य कच्चा माल वापरून बनत होते पदार्थ
या तपासणीदरम्यान अधिक धक्कादायक बाब म्हणजे, ग्राहकांच्या आरोग्याशी थेट खेळ मांडत चक्क मुदतबाह्य (Expired) कच्चा माल वापरून बेकरीचे विविध पदार्थ तयार केले जात असल्याचे उघडकीस आले. या बेकरीमध्ये स्वच्छतेच्या नियमांना पूर्णपणे केराची टोपली दाखवण्यात आली होती, ज्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला होता.
Bangalore Iyangars Bakery Sealed : बेकरीचा परवाना निलंबित, दुकान केले सील
बेकरी चालकाचा हा निष्काळजीपणा आणि नियमांचे उल्लंघन पाहता, अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी जागीच कडक पावले उचलली. या बेकरीचा अन्न व्यवसाय परवाना (Food License) तात्काळ आणि जागेवरच निलंबित करण्यात आला आहे. तसेच, या बेकरीचा संपूर्ण व्यवसाय तातडीने बंद पाडत प्रशासनाच्या वतीने दुकान सील करण्यात आले आहे.
Food Safety Warning Latur : अन्न सुरक्षा विभागाचा विक्रेत्यांना इशारा
अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी घेतलेल्या या आक्रमक निर्णयामुळे रेणापूरमधील इतर व्यावसायिकांचेही धाबे दणाणले आहेत. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या कोणत्याही अन्नपदार्थ विक्रेत्याची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा या कारवाईच्या माध्यमातून प्रशासनाने दिला आहे. आगामी काळातही जिल्ह्यातील अशा बेकायदा आणि अस्वच्छ हॉटेल्स तसेच बेकऱ्यांवर कारवाईचे सत्र सुरूच राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
ही बातमी वाचा:
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, ‘त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे…’