इंग्लंड दौऱ्यावर अखेर भारताला पहिला विजय मिळाला आहे. भारताने पहिला वनडे सामना 6 विकेटने जिंकला. भारताच्या विजयात शुबमन गिल महत्वाची इनिंग खेळला. गिलने 80 रन्स केले. त्याचवेळी दुसऱ्याबाजूला वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल यांची इनिंग सुद्धा महत्वाची ठरली. त्यामुळे भारताला पहिला वनडे सामना सहज जिंकता आला. अक्षर पटेलला त्याच्या इनिंगसाठी प्लेयर ऑफ द मॅचच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. या सामन्यात इंग्लंडचा डाव सुरु असताना एक गोष्ट घडली. त्याने विजयाचा पाया रचला. शानदार फॉर्ममध्ये असलेल्या हॅरी ब्रूकसाठी हेड कोच गौतम गंभीर यांनी अचूक प्लान बनवलेला. त्याचा फायदा भारतीय संघाला झाला. हॅरी ब्रूक क्रीजवर आल्यानंतर गौतम गंभीरने प्रिन्स यादव मार्फत जसप्रीत बुमराहला गोलंदाजीला आणण्याचा मेसेज पाठवला.
बरोबर, पुढच्याच ओव्हरमध्ये शुबमन गिलने बुमराहच्या हाती चेंडू सोपवला. त्यानंतर पहिल्याच चेंडूवर भारताला विकेट मिळाला. या एकाविकेटमुळे इंग्लंडची टीम पूर्णपणे बॅकफूटवर ढकलली गेली. पुन्हा एकदा गौतम गंभीरच्या अचूक रणनितीमुळे सामन्याचं पारडं भारताच्या बाजूने झुकलं. गौतम गंभीरच्या या मास्टर स्ट्रोकचं सोशल मीडियावर भरपूर कौतुक होतय. या मॅचमध्ये अक्षर पटेलच्या ऑल राऊंडर परफॉर्मन्समुळे भारताला विजय मिळवला. अक्षरने घेतलेल्या चार विकेटमुळे इंग्लंडचा डाव 258 धावांवर आटोपला. त्यानंतर 52 चेंडूत 57 धावा करुन विजयी लक्ष्य गाठण्यात अक्षरने महत्वपूर्ण योगदान दिलं. त्याच्यासोबत वॉशिंग्टन सुंदरने 52 धावा केल्या.
एकवेळ भारताची स्थिती 4 बाद 160 धावा होती
भारताला विजयासाठी 259 धावांचं लक्ष्य मिळालं होतं. भारताने 45.2 ओव्हर्समध्ये चार विकेट गमावून 262 धावा करुन हा सामना जिंकला. एकवेळ भारताची स्थिती 4 बाद 160 धावा होती. त्यानंतर अक्षर आणि वॉशिंग्टनने पाचव्या विकेटसाठी 102 धावांची भागीदारी करुन भारताला सोपा विजय मिळवून दिला. गिल शानदार फॉर्ममध्ये दिसला. त्याने 75 चेंडूत 80 धावा करताना 11 चौकार आणि 1 षटकार लगावला. दुखापतीमुळे त्याला मैदान सोडावं लागलं. आयर्लंड आणि इंग्लंडमधील टी20 सीरीजमध्ये टीम इंडियाला मोठ्या अपयशाचा सामना करावा लागला होता.