Karjat Crime: कर्जतमध्ये दोन तोतया पोलीस अधिकाऱ्यांनी रिसॉर्ट मालकांना धमकावून पैसे उकळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दोन्ही भामट्यांनी पोलिसांनी आता अटक केली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
रायगड, अमुलकुमार जैन: कर्जत मधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. तोतया पोलिसांचे कारनामे पाहून व्यवसायिकांना घास्ती भरली होती. कर्जत तालुक्यातील रिसॉर्ट मालकांना धमकावून पैसे उकळणाऱ्या या दोन तोतया पोलिस अधिकाऱ्यांना अखेर कर्जत पोलिसांनी गजाआड केले आहे. शुभम राऊत आणि समीर दुधासे अशी या दोघांची नावे असून, हे दोघे स्वतःला “जिल्हा पोलीस अधिक्षक” आणि “पोलीस निरीक्षक” असल्याचे सांगत रिसॉर्ट मालकांना फसवत होते.
या दोघांचे धक्कादायक कारनामे समोर आले आहेत. दोघेही फोनवर संपर्क साधून म्हणायचे, “तुमच्या फार्मवर अल्पवयीन जोडपे आले होते, त्यांचं अश्लील शूटिंग झालं आहे. त्यामुळे तुमच्यावर POSCO अंतर्गत गुन्हा दाखल होणार आहे. आमचे पथक पुण्यातून निघाले आहे, तुमचा फार्म सील होईल आणि तुम्हाला अटक केली जाईल,” अशा धमक्या देत ते सेटलमेंटच्या नावाखाली पैसे उकळत होते. मोठी बातमी: मुख्यमंत्री फडणवीस-मनोज जरांगे पाटील दिसणार एका मंचावर, मराठा आरक्षणानंतर पहिल्यांदा एकत्र येण्यामागचं कारणही आहे खास…. या धमक्यांना बळी पडून वारे गावातील धनंजय म्हसे यांनी १२ हजार रुपये ऑनलाइन ट्रान्सफर केले, चेतन घुमरे यांनी १५ हजार, तर समीर कुडूसकर यांनी ५ हजार रुपये दिले. सर्व पैसे ‘आराध्या दुधासे’ या खात्यावर जमा केले जात होते.
पण, अखेर या फसवणुकीचा पर्दाफाश झाला. भूमिपुत्र फार्म संघटनेचे अध्यक्ष उदय पाटील, बिपीन लाड आणि अनिल भोसले यांनी एकत्र येऊन कर्जत पोलिसांकडे तक्रार दाखल केली. उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी जलदगतीने तपास करून शुभम आणि समीर या दोघांना अटक केली आहे.
महत्त्वाचे म्हणजे, पोलिसांनी केवळ आरोपींना पकडलेच नाही, तर त्यांनी घेतलेली सर्व रक्कम परत करण्यासही भाग पाडले. या धडाकेबाज कारवाईनंतर कर्जत पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. यानंतर रिसॉर्ट व्यवसायिकांनी सुटकेचा श्वास घेतला असून, स्थानिक स्तरावर पोलिसांवरील विश्वास आणखी दृढ झाल्याचे चित्र आहे. या प्रकरणाने एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की तोतया वर्दीधारींचा काळ आता संपला आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा