गीतकार आनंद बक्षी यांनी जेव्हा या गाण्याचे बोल राजीव राय यांना ऐकवले, तेव्हा त्यांनी ते चीप असल्याची प्रतिक्रिया दिली. त्यावर आनंद बक्षी यांनी स्पष्ट केले की, हे गाणं कोणत्याही मुलीवर लिहिलेले नसून ते दारूच्या बाटलीवर आधारित आहे. ही बाब समजल्यानंतर राजीव राय यांनी अखेर हे गाणे चित्रपटात ठेवण्याचा निर्णय घेतला.