वीर देसाई रोडवर आढावा घेताना अमित साटम यांच्याशी संवाद साधण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले, आज आम्ही मिरा देसाई रोडवर पाणी तुंबलं असल्यामुळे नेमकं कारण काय आहे? हे बघण्यासाठी महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांसोबत आम्ही इथे आलो आहोत. हा भाग सखल असल्यामुळे हाय टाईड असल्यामुळे, नाल्याची उंची जास्त असल्यामुळे पाण्याचा निचरा होत नाहीये. त्यामुळे इथे आपण काय उपाय योजना करु शकतो, किती पंप लावले आहेत किंवा गाळ कुठे साचला आहे का, प्लास्टीक कुठे अडकलं आहे का, याची पाहणी करण्याकरता आम्ही आलो आहे.