या गाण्याचे चित्रीकरण सुपरस्टार राजेश खन्ना आणि अभिनेत्री झीनत अमान यांच्यावर करण्यात आले होते. दोघांमधील रोमँटिक केमिस्ट्री, निरागस भावभावना आणि प्रेमाचे सुंदर चित्रण यामुळे हे गाणं प्रेक्षकांच्या मनात घर करून गेले. विशेष म्हणजे या गाण्याचे चित्रीकरण धावत्या रेल्वेत करण्यात आले होते, जे त्या काळात विशेष आकर्षण ठरले.