विनायक राऊत यांच्या जागी सर्वसामान्य व्यक्ती असता तर… अंजली दमानिया यांची जोरदार टीका.. – Marathi News | Anjali Damania has leveled serious allegations against the government as well as Vinayak Raut leader of the Thackeray faction


सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राजकीय स्थितीवर मोठे भाष्य केले. यावेळी त्यांनी विनायक राऊत यांना अटक झाली पाहिजे, अशी थेट मागणीच करून टाकली. विनायक राऊत प्रकरणावर बोलताना अंजली दमानिया यांनी म्हटले की, विनायक राऊत यांना अटक होणे गरजेचं होतं पण सामान्य माणूस असता तर त्याला अटक केली असती पण इथे तसं घडताना दिसत नाही. नेत्यांना धडा शिकवणं गरजेचं आहे. फिरोज बाबा, काझी बाबा यांना अटक करणं गरजेचे आहे. सोनम वांगचूक यांच्याकडे नेत्यांचं दुर्लक्ष आहे, भावना शुन्य सरकार आहे, राजकीय भेद असू शकतात पण माणूस म्हणून त्यांची स्थिती पाहायला हवी.

पुढे अंजली दमानिया यांनी म्हटले की, डब्ल्युबीसी, शुगर, बीपी ड्राॅप झालंय. पत्नीचंही ऐकत नाहीयेत… मी एका कारणासाठी केलंय ते सारथ्य झाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही अशी त्यांची भुमिका आहे. त्यांची प्रकृती खालावतेय, आणि निर्दयी सरकारला काही घेण देणं नाही, काहीच लाज नाही… असंवेदनशील सरकार आहे, असेही अंजली दमानिया यांनी म्हटले.

हे आंदोलन चिघळले असं दिसत नाही ही मुलं तशी दिसत नाहीत पण संताप हा येणारच… मी स्वतः दिल्लीला जाऊन काल रात्री दोनला परत आले. यादरम्यान सिया गोयल हिच्या कुटुंबाबद्दल बोलताना अंजली दमानिया यांनी म्हटले की,  सियाचं कुटूंब निकृष्ट दर्जाचं सामान विकून मोठी झाली असतील अभिनंदन तुकाराम मुंढे यांचे. सुधीर मुनगंटीवार यांना डावललं जातंय, यापुर्वीही डावललं जातं होते, अतिशय दुर्दैवी आहे.

प्रफुल्ल पटेल आणि तटकरे हे कपटी नेते, जेवढं लवकर हे सुनेत्रा पवार यांना कळेल तेवढं चांगल. सुनेत्रा पवारांकडे सगळे रेड फ्लॅग्स आहेत… योग्य ती कार्यवाही त्यांनी करावी, असेही यादरम्यान बोलताना अंजली दमानिया यांनी म्हटले. शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांना कोर्टाकडून दिला मिळाला नाही. विनायक राऊत यांची सून गिरीजा राऊत हिने संपूर्ण कुटुंबावर गंभीर आरोप केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *