अमरावती बाजारात शेवग्याला अपेक्षित दर मिळत नसल्याने त्यांनी कच्चा माल म्हणून विक्री करण्याऐवजी त्याचे प्रॉडक्ट बनवून विक्री करण्याचा मार्ग स्वीकारला. शेवग्यापासून पावडर, लाडू, ग्रीन टी, अर्क, साबण, शाम्पू आणि सरबत पावडर अशी विविध उत्पादने तयार करण्यास सुरुवात केली. यासाठी त्यांनी कृषी विज्ञान केंद्र, दुर्गापूर येथे प्रशिक्षण घेतले. तसेच महिला बचत गटांशी समन्वय साधून उत्पादन प्रक्रियेला अधिक बळ दिले.
