vaibhav khedekar: मनसेचे निष्ठावान नेते वैभव खेडेकर यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. १४ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
राज ठाकरेंचे निष्ठावंत अशी ओळख असलेले मनसे नेते वैभव खेडेकर यांची पक्षाने हकालपट्टी केली होती. त्यांच्या पक्ष सोडण्याच्या हालचाली लक्षात घेत ही कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर अनेक दिवसांनी वैभव खेडेकर यांच्या भाजप प्रवेशाला महूर्त लाभला आणि त्यांनी आज १४ ऑक्टोबर २०२५ रोजी मुंबईमध्ये भाजपत प्रवेश केला आहे.
वैभव खेडेकर हे मनसेच्या स्थापनेपासूनच ते राज ठाकरेंबरोबर राहिले होते. वैभव खेडेकरांनी खेड नगरपरिषदेवर मनसेचा झेंडा फडकावला होता. ते खेडचे नगराध्यक्षही राहिले आहेत. यंदा मात्र खेडचे नगराध्यक्षपद खुल्या महिला प्रवर्गासाठी राखीव राहिल्याने खेडेकरांना पदावर राहता आलं नाही. भाजपमध्ये वैभव खेडेकरांचा पक्षप्रवेश ठरलेला असताना तो तीनवेळा टळला होता. प्रत्येकवेळी काहीना काही अडचण येत होती. त्यामुळे त्यांचं राजकीय भविष्यही अधांतरीचं राहिलं की काय असा संभ्रम तयार झाला होता. मात्र आज त्यांच्या पक्षप्रवेशाने या संभ्रमाला फुल स्टॉप लागला आहे. प्रवेश होत नसल्याने खेडेकरांनी मुंबई गाठली होती. रवींद्र चव्हाण, प्रवीण दरेकर यांच्याशीही चर्चा केली होती. पक्षप्रवेश कधी होणार, अशा चर्चा असताना आज त्यांचा अचानक प्रवेश पार पडला. त्यांचा हा प्रवेश भाजपला कोकणात मजबुत परिस्थितीत घेऊन जाणारा ठरणार आहे. कारण त्यांच्यामागे मोठा मतदार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या दृष्टीने हा प्रवेश भाजपसाठी महत्वाचा आहे.
अनिल परब, उदय सामंत, संजय शिरसाट एकाच लिफ्टमध्ये, ठाकरे-शिंदेंचे नेते आमनेसामने!
पक्षप्रवेशानंतर म्हणाले.. माझ्या देवाने मला स्वतः पासून दूर केलं, काही कारणं असतील पण दुरावा निर्माण झाल्यानं खूप मला दुःख आहे. आता भाजप जोमाने वाढवणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप शतप्रतिशत करण्यावर भर असेल. असं, मत एका वृत्तवाहिनीशी बोलताना वैभव खेडेकरांनी व्यक्त केलं आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा