ICC Ranking: वनडेत गिलचं अव्वल स्थान 1 गुणाने हुकलं, मालिका पराभव आणि इतक्या धावांमुळे नुकसान – Marathi News | Shubman Gill misses out on the top spot in the ICC ODI rankings by one point series defeat and a deficit of 15 20 runs prove costly


ICC Ranking: वनडेत गिलचं अव्वल स्थान 1 गुणाने हुकलं, मालिका पराभव आणि इतक्या धावांमुळे नुकसानImage Credit source: BCCI

भारत आणि इंग्लंड यांच्यात वनडे मालिका नुकतीच पार पडली. या मालिकेत भारताला 1-2 ने पराभवाचं तोंड पाहावं लागलं. मालिकेतील पराभवानंतर आता आयसीसीने वनडे क्रमवारी जाहीर केली आहे. यात कर्णधार शुबमन गिलचं अव्वल स्थान अवघ्या एका धावेने हुकलं आहे. त्याला दुसर्‍या स्थानावर समाधान मानावं लागलं आहे. कर्णधार शुबमन गिलने वनडे मालिकेत जबरदस्त कामगिरी केली. पण असूनही त्याला अव्वल स्थान काही गाठता आलं नाही. आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत शुबमन गिल दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचं 801 इतकं गुणांकन आहे. तर पहिल्या क्रमांकावर असलेल्या न्यूझीलंडच्या डॅरेल मिचेल 802 गुणांकनासह अव्वल स्थानी आहे. शुबमन गिलने या मालिकेत धावा करूनही त्याचं नुकसान झालं आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यानंतर त्याचं गुणांकन 803 होतं. पण दुसऱ्या आणि तिसऱ्या वनडेनंतर यात 2 गुणांची घसरण झाली आणि गुणांकन 801 झालं.

शुबमन गिलला धावा करून बसला फटका

शुबमन गिलने इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेतील 3 सामन्यात 94 च्या सरासरीने 188 धावा केल्या. त्यात तीन सामन्यापैकी दोन सामन्यात अर्धशतक ठोकलं. त्याने पहिल्या सामन्यात नाबाद 80, दुसऱ्या सामन्यात 31 आणि तिसऱ्या सामन्यात 77 धावांची खेळी केली. लॉर्ड्सवरील शेवटच्या वनडे सामन्यात शुबमन गिलने 77 धावांवर बाद झाला. खरं तर या सामन्यात त्याने आणखी 15 ते 20 धावा केल्या असत्या तर चित्र काही वेगळं असतं. शुबमन गिल 95 किंवा शतकी खेळी करून बाद झाला असता तर त्याला 2 ते 3 गुण अधिकचे मिळाले असते आणि अव्वल स्थानी पोहोचला असता.

मालिका पराभवामुळे असं नुकसान

आयसीसी नियमानुसार, खेळाडूने वैयक्तिक कितीही धावा केल्या तर संघाच्या कामगिरीचाही परिणाम होतो. कारण सामना किंवा मालिका जिंकली की हरली यावर त्याचं वेटेज ठरतं. भारताने इंग्लंडविरुद्धची मालिका 1-2 ने गमावली. त्यामुळे त्याच्या वैयक्तिक कामगिरीवर परिणाम दिसून आला. जर ही मालिका भारताने 2-1 ने जिंकली असतील तर शुबमन गिलने 802चं गुणांकन पार केलं असतं.जर भारताने इंग्लंडविरुद्धची मालिका 3-0 किंवा 2-1 अशी जिंकली असती, तर गिलला त्याच्या 188 धावा आणि मालिका विजयाचे मिळून 35 गुण मिळाले असते. तो सहज 806 गुणांवर गेला असता. पण मालिका गमावल्याने 188 धावा करूनही केवळ 29 गुण मिळाले. तसेच 801 गुणांकनावरच थांबला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *