Adhik Maas: अधिक मास संपताच फक्त 12 दिवसचं लग्नाचे मुहूर्त? पुन्हा शुभ कार्य निषिद्ध? जून-जुलै विवाह मुहूर्त जाणून घ्याच…


Adhik Maas: हिंदू धर्मात अधिक मास अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, हा अधिक मास 2026 मध्ये 17 मे पासून सुरू झाला, जो आता 15 जून रोजी संपणार आहे. अधिक मास दर तीन वर्षांनी एकदा येतो. अधिक मास संपल्यानंतर, विवाहाच्या शुभ मुहूर्तांची सुरुवात होईल.. ज्योतिषींच्या मते, जून आणि जुलैमध्ये लग्नासाठी फक्त 12 शुभ मुहूर्त आहेत. त्यानंतर, पुढील चार महिन्यांसाठी शुभ कार्यक्रमांवर बंदी घातली जाईल. काय आहे कारण? महत्त्व जाणून घ्या…

अधिक मास कधी संपतोय? (Adhik Maas)

पंचांगानुसार, अधिक मासाच्या कृष्ण पक्षातील अमावस्येची तारीख 14 जून रोजी दुपारी 12:19 पासून ते 15 जून रोजी सकाळी 08:23 पर्यंत आहे. अमावस्येचा सूर्योदय 15 जून रोजी होईल, त्यामुळे अधिक मासाची अमावस्या 15 जून रोजी आहे. तो दिवस अधिक मास समाप्तीचे प्रतीक आहे आणि 16 जून रोजी ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाची सुरुवात होते.

जून-जुलै विवाहाचे शुभ मुहूर्त (Vivah Muhurta 2026)

पंचांगानुसार, 15 जून रोजी अधिक मास संपल्यानंतर, विवाहासाठी पहिला शुभ मुहूर्त 21 जून रोजी आहे. जून महिन्यात लग्नासाठी आठ शुभ दिवस आहेत, तर जुलै महिन्यात फक्त चार दिवसच मुहूर्त आहेत.

जून महिन्यात लग्नाचे मुहूर्त

21 जून, रविवार: शुभ विवाह मुहूर्त: सकाळी 9:31 ते सकाळी 11:21

22 जून, सोमवार: शुभ विवाह मुहूर्त: 23 जून रोजी सकाळी 10:31 ते सायंकाळी 5:24

23 जून, मंगळवार: शुभ विवाह मुहूर्त: सकाळी 5:24 ते सकाळी 10:13

24 जून, बुधवार: शुभ विवाह मुहूर्त: 1:59 PM ते 25 जून रोजी सकाळी 5:25

जून 25, गुरुवार: शुभ विवाह मुहूर्त: 5:25 सकाळी ते 7:08 सकाळी

26 जून, शुक्रवार: शुभ विवाह मुहूर्त: 27 जून रोजी संध्याकाळी 7:16 ते सकाळी 5:25

27 जून, शनिवार: शुभ विवाह मुहूर्त: सकाळी 5:25 ते रात्री 10:11

29 जून, सोमवार: शुभ विवाह मुहूर्त: 4:16 सायंकाळी ते 30 जून रोजी सकाळी 4:03

जुलै महिन्यात लग्नाचे मुहूर्त 2026

1 जुलै, बुधवार: शुभ विवाह मुहूर्त: सकाळी 6:51 ते दुपारी ४:०४

6 जुलै, सोमवार: शुभ विवाह मुहूर्त: दुपारी 1:41 ते सकाळी 5:29, 7 जुलै

7 जुलै, मंगळवार: शुभ विवाह मुहूर्त: 5:29 AM ते 2:31 PM

11 जुलै, शनिवार: शुभ विवाह मुहूर्त: 12:05 AM ते 5:32 AM, 12 जुलै

चार महिन्यांसाठी शुभ कार्य निषिद्ध?

वैदिक पंचांगानुसार, 25 जुलैपासून चातुर्मास सुरू होत असल्याने त्या दिवसापासून विवाहसारखे शुभ कार्य निषिद्ध आहेत. चातुर्मासात भगवान विष्णू योगिक निद्रेत जातात आणि त्यामुळे विवाहसोहळ्यांसहित इतर शुभ समारंभ पार पाडले जात नाहीत.

हेही वाचा

Weekly Lucky Zodiac Signs: पुढचे 7 दिवस…डबल लाभ.. 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! पॉवरफुल बुधादित्य राजयोग, कोणाला मालामाल करणार? पैसा, नोकरी, प्रेम…

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *