हिंमत असेल तर मुंब्र्यात पांढऱ्या पट्ट्या मारून दाखवा… मनसेने जैन मुनींना ललकारले; आमच्या नादी… – Marathi News | MNS leader Sandeep Deshpande has given strong response to the call made by Jain religious leaders


जैन धर्मीयांनी रस्त्यावर मारलेल्या पांढऱ्या पट्टयांवरुन मोठा वाद झाला. अगोदर घाटकोपर त्यानंतर दादर आणि आज चर्नी रोड परिसरात जैन धर्मियांकडून पांढऱ्या पट्ट्या मारण्यात आल्या. यावरून मनसेने मोठा इशारा दिला. काल दादर परिसरात मनसेचे नेते संदीप देशपांडे स्वत: या विरोधात रस्त्यावर उतरले होते. त्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. थेट संदीप देशपांडे यांच्या कार्यालयाबाहेरही या पट्ट्या मारण्यात आल्या. शेवटी वाद वाढल्याचे लक्षात येताच पालिकेने मध्यस्थी करत हा पट्ट्या काढल्या. पालिकेने स्पष्ट शब्दात सांगितले की, अशा प्रकारच्या पांढऱ्या पट्ट्या मारण्याची कोणतीही परवानगी देण्यात आली नाहीये. मनसेने दिलेल्या इशाऱ्यानंतर जैन धर्म गुरुंनीही मोठा इशारा देत आम्ही काय हातात बांगड्या भरल्या नसल्याचे म्हटले. पांढरा रंग हा शांतीचे प्रतिक असल्याचे त्यांनी म्हटले. मनसेने मुंब्र्यात जावे, असेही यादरम्यान म्हणत त्यांनी डिवचले.

आता यादरम्यानच मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी मोठे विधान केले. संदीप देशपांडे यांनी म्हटले की, कोणतरी चंद्रावर राहणारा मुनी आहे ते बोलला आम्ही बांगड्या भरल्या नाहीत. या वाक्यमुळे त्यांची महिलेबाबत मानसिकता दाखवून देत आहे..आणि तिथेच हा अडचणीचा भाग आहे. आमच्याकडे इतिहास वेगळा आहे, अहिल्याबाई होळकर वीर महिला आमच्याकडे आहेत त्यांकडे नाहीत.

जगप्रसिद्ध असे भोगण्याच्या विरोधात आंदोलन मनसैनिकांनी केले होते. जेव्हा आंदोलन होते तेव्हा नीलेश चंद्र घरी शेपट्या घालून बसले होते. आम्हीकुठे आंदोलन करायचे हे आम्हाला त्यांनी सांगायची गरज नाही. मुंबईत दादरमध्ये पट्ट्या मारल्या तश्या मुंब्रामध्ये सफेद पट्टी मारून दाखवाव तुमच्यात हिमत असेल तर.

आमची जी भोंग्याच्या बाबतीत भूमिका आहे तीच पांढऱ्या पट्ट्यांच्या बाबतीत आहे. माझ्या घरासमोर मच्छी मार्केट नको मी मासे खात नाही हा सांस्कृतिक दहशत वाद झाला. तुम्ही मासे खाऊ नका हा संस्कृत दहशतवाद झाला आम्ही याला खतपाणी घालू देणार नाही. कबुतरांना सार्वजनिक ठिकाणी खायला घालू हा दहशत वाद झाला. समाज सुधारक कोणीही त्यांच्यातील झाले नाहीत. असंख्य समाज सुधारक होऊन गेले ज्यांनी अंधश्रद्धा रद्द करून समाजाला पुढे न्हाले.

आमचे आव्हान आहे शिकलेले लोक आहेत त्यांना..परंपरा बदलण्यात काही चूक नाही. तुम्ही राहता तिथे कायदे आणि नियम आहेत ते पालन करणे सर्वांचे कर्तव्य आहे. एकादी चुकीची परंपरा असेल तर ती परंपरा सुधारणे गरजेचे आहे.  कायदा सांगतो रस्ता हा पब्लिक प्रोपर्ट आहे. तिथे काही केले तर दंड आकारण्यात येणार. यामध्ये नियम आहेत रस्ते विदृतीकरण करण्याचा कोणालाही अधिकार नाही.

या नियमांचे पालन केले पाहिजे..कायदा पेक्षा कोणी मोठा नाही. ज्या धर्मगुरूंना वाट महिला कमजोर आहेत..त्यांच्याबद्दल काय बोलायचे. मी शिकलेल्या लोकांना उत्तर देतो..वाटतं नाही नीलेशचंद्र शिकलेला असेल ते कोणत्या शाळेत शिकले ही माहिती मला पाहिजे..त्यांना विचारला पाहिजे की कोणत्या शाळेत शिकलात तुम्ही व्यापाऱ्यांना हिशोब समजतो मात्र शिकलेले नसतात, आमच्या नादाला लागू नका..जिथे जिथे असे प्रकार होतील तिथे मनसैनिक पोहोचतील.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *