नुकत्याच झालेल्या पेपरफुटीच्या निषेधार्थ ‘कॉकरोच जनता पार्टी’ दिल्लीतील जंतर मंतर येथे गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहे. 20 जुलै रोजी, आंदोलकांनी संसदेकडे मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. हजारो विद्यार्थी आणि तरुण जमले होते. संसदेकडे पुढे सरकणाऱ्या जमावाला रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि अश्रुधुराच्या नळकांड्याही फेकल्या. आता यानंतर आंदोलन चिघळले. या आंदोलनाचा हिंसकवळण प्राप्त झाल्यानंतर अनेकांनी यावर भाष्य केले. अनेक सेलिब्रिटींना यानंतर या आंदोलकांसाठी आपला पाठिंबा दर्शवला आहे. या आंदोलनाबद्दल भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनने या घटनेबद्दल आता एक विधान केले आहे.
आयसीसी प्रेझेंटर संजना गणेशनने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात तिने म्हटले आहे की, “हे जर आंदोलनापासून दूर बसलेल्या सहा वर्षांच्या मुलासोबत घडू शकते, तर ते कोणासोबतही घडू शकते. कोणत्याही लोकशाही व्यवस्थेत अश्रुधुराच्या धुरामुळे मुलांचा श्वास गुदमरतो, ही बाब कधीही सामान्य मानली जाऊ नये. शांततापूर्ण नागरिकांनी त्यांचे संरक्षण करण्यासाठी असलेल्या यंत्रणेलाच घाबरून जगण्याची वेळ येऊ नये.”
जंतर मंतरवर काय घडले?
20 जुलै रोजी दिल्लीतील संसदेच्या अधिवेशनादरम्यान, शिक्षण व्यवस्था, पेपरफुटी आणि रोजगार सुधारणा यांसारख्या मुद्द्यांवरून तरुणांनी आंदोलन केले. आंदोलकांनी संसद भवनाकडे मोर्चा वळवला, त्यामुळे जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज आणि अश्रुधुरा नळकांड्यांचा वापर करावा लागला. आंदोलकांमध्ये काही मुलांचाही समावेश होता आणि अनेक जण जखमी झाले. या घटनेनंतर, अनेक सेलिब्रिटी व्यक्तींनी या विषयावर प्रतिक्रिया देत आहेत. अजूनही हे आंदोलन सुरु आहे. आंदोलकांची एकच मागणी आहे की केंद्रीय शिक्षण मंत्री यांनी याच्या पदाचा राजीनामा द्यावा. पण अजून यावर काहीच अपडेट आलेली नाही.
आता काल या आंदोलनात राहुल गांधी, सोनिया गांधी पण सामील झाले होते. शरद पवारही या आंदोलकांना भेटायला आले होते. ठाकरे सेनेचे नेते संजय राऊत, अरविंद सावंत आणि अनिल देसाई हे अभिजीत दिपके आणि आंदोलकांची भेट घेण्यासाठी काल जंतर मंतरवर गेले होते.