‘देशावर संकट आल्यावर मोठी मोठी लोक माझं नाव घेतात’, शरद पवारांचं विधान चर्चेत


Sharad pawar speech, baramati: शरद पवारांनी बारामतीमध्ये तरुणांशी संवाद साधताना एक वक्तव्य केलं आहे. जे सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

Sharad Pawar new speech at baramati
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
बारामती, दीपक पडकर : चिकाटी सोडू नका, कष्ट करायची ताकद ठेवा. कोणतंही संकट आलं तरी चिंता करू नका. काही प्रश्न आला तर त्याची सोडवणूक करू मात्र काम नीट करा. कष्टाने करा, लोकांनी म्हटलं पाहिजे की काम द्यायचं असेल तर बारामतीच्या मुलांना देण आवश्यक आहे. हा संदेश देशात गेला पाहिजे. देशाला संकट आलं तर मोठी मोठी लोक शरद पवारांचं नाव घेतात. त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका, असे मोठे विधान ज्येष्ठ नेते शरद पवारांनी बारामतीत आज केले.

शरद पवार हे मागील चार दिवसांपासून बारामती दौऱ्यावर आहेत. सोमवारी पवारांच्या उपस्थितीत एक खाजगी कार्यक्रम पार पडला.यावेळी पवार होते. पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, पहिल्यांदा जेव्हा जनतेने मला राज्य सरकारमध्ये काम करण्याची संधी दिली. तेव्हा पहिला निर्णय मी असा घेतला की, बारामतीत एमआयडीसी काढायची. दुधावर प्रक्रिया करणारी डायनामिक्स सारखी कंपनी आणायची. या कामासाठी काही लोकांनी खूप सहकार्य केलं.
Maharashtra TimesPune News: ‘शनिवार वाडा मेधा कुलकर्णींच्या पप्पांचा नाही’; शनिवारवाड्यातून रुपाली पाटलांचा मेधा कुलकर्णींवर जोरदार हल्लाबोल
त्यामध्ये रुई, सावळ, वंजारवाडी येथील शेतकऱ्यांना विचारले की मला इथे कंपनी आणायची आहे. तुम्ही मला जागा द्याल का. त्यावेळी शेतकऱ्यांनी दोन्ही हात वर करून संमती दिली. आणि त्यानंतर उद्योगाचे केंद्र म्हणून बारामतीकडे पाहिलं जाऊ लागलं. पुढे शिक्षणाच्या सोयी केल्या. याचा परिणाम असा झाला की, विविध राज्यात मी ज्यावेळेस फिरतो तेव्हा अनेक मुलं मुली सांगतात की मी बारामतीत शिक्षण घेतल आहे.

वंजारवाडी गावाला शरद पवारांची भेट

बारामती तालुक्यातील वंजारवाडी येथे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारांनी अनेक वर्षानंतर भेट दिली. भेटी दरम्यान त्यांनी गावातील युवकांच्या रोजगारां संदर्भात माहिती जाणून घेतली. ग्रामस्थांनी रोजगार संदर्भात असणाऱ्या विविध समस्या शरद पवारांसमोर मांडल्या. ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेत, त्या समस्या सोडवण्याचे आश्वासन पवार यांनी यावेळी दिले. स्थानिक युवकांना बारामती, एमआयडीसीत अनेक कंपन्यांमध्ये स्थान दिले जात नाही.

हॉटेल भाग्यश्रीमध्ये पुन्हा राडा, हॉटेल कामगारांनीच तरूणाला चोपलं?, मालकाने सगळं सांगितलं!

स्थानिक असल्यामुळे त्यांच्यावर अन्याय होतो. त्यांना डावलले जाते. या समस्या शरद पवारांनी जाणून घेतल्या. तसेच नव्या पिढीला रोजगार मिळवून देण्यासाठी तयारी दाखवली. असल्याची माहिती वंजारवाडीचे सरपंच जगन्नाथ वनवे यांनी दिली.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा