Garud Puran: आजकाल अनेक घरात स्वच्छतेच्या नावाखाली कोणत्याही वेळी घर झाडले जाते. मात्र कधी कधी अशा काही विशिष्ट वेळा असतात, ज्या वेळेत घर झाडणे शुभ मानले जात नाही, तुम्ही अनेकदा पाहिले असेल, आपल्या घरात, वडीलधारी मंडळी अनेकदा छोट्या-छोट्या गोष्टींवरून आपल्याला अडवतात. संध्याकाळ होताच, आपली आजी किंवा आई आपल्याला घर झाडू नका असे सांगतात. लहानपणी हा एक सामान्य नियम वाटायचा. पण तुम्हाला माहितीय का की यामागे एक मोठं धार्मिक रहस्य आहे? धर्मग्रंथांनुसार, संध्याकाळनंतर झाडू मारणे अत्यंत अशुभ मानले जाते. ही एक अशी चूक आहे जी एका क्षणात श्रीमंत व्यक्तीलाही कंगाल बनवू शकते. याबाबत गरुडपुराणात नेमकं काय म्हटलंय? जाणून घेऊया…
गरुड पुराणानुसार, संध्याकाळच्या वेळी घराला झाडू का मारू नये? (Garud Puran)
सनातन धर्माचा एक प्रसिद्ध ग्रंथ असलेल्या गरुड पुराणात याचा स्पष्ट उल्लेख आहे. गरुड पुराणानुसार, सूर्यास्तानंतर घराचे वातावरण बदलू लागते. दिवसभराच्या धावपळीनंतर घरात सकारात्मक ऊर्जा जमा होते. मात्र जेव्हा आपण रात्री किंवा अंधार पडल्यावर घर झाडतो, तेव्हा ही सकारात्मक ऊर्जा घरातून बाहेर टाकली जाते. घरात शांतता आणि आनंद टिकवून ठेवण्यासाठी ही सकारात्मक ऊर्जा घरात राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
देवी लक्ष्मीचं आगमन….(Goddess Lakshmi)
धार्मिक श्रद्धेनुसार, संध्याकाळच्या वेळी देवी लक्ष्मी घरात प्रवेश करते. ही वेळ अत्यंत पवित्र मानली जाते. जेव्हा देवी लक्ष्मी तुमच्या घरात सुख आणि समृद्धी आणण्यासाठी येत असते आणि तुम्ही त्याच वेळी घर झाडून कचरा बाहेर फेकता, तेव्हा देवी लक्ष्मी क्रोधित होते. क्रोधित लक्ष्मी त्या घरात कधीही राहत नाही. जेव्हा संपत्तीची देवी क्रोधित होऊन निघून जाते, तेव्हा घरात गंभीर आर्थिक संकट सुरू होते. तुमची बचतही हळूहळू कमी होऊ लागते.
रात्री घर झाडल्याने काय होते?
गरुडपुराणात असे म्हटले आहे की, रात्री घर झाडल्याने घरात गरिबी आणि दारिद्र्यता येते. गरिबी म्हणजे घरात दुःख, आजारपण आणि क्लेश यांचे आगमन होते. अनेकदा लोक नकळतपणे रात्री साफसफाई करतात आणि सर्व कचरा बाहेर फेकून देतात. असे केल्याने कचऱ्यासोबत घरातील सुदैवही निघून जाते. यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये भांडणे वाढतात. अनावश्यक खर्च वाढतो आणि लोक प्रत्येक पैशासाठी परावलंबी बनतात.
रात्री केर काढावाच लागला तर…
गरुडपुराणानुसार, तुम्हालाही तुमच्या आयुष्यात सुख आणि समृद्धी हवी असेल, तर संध्याकाळच्या आधी तुमच्या घरातील साफसफाईची सर्व कामे पूर्ण करा. जर तुम्हाला रात्री केर काढावाच लागला, तर कचरा रात्री बाहेर टाकू नका. तो घराच्या एका कोपऱ्यात गोळा करा आणि सकाळी बाहेर फेकून द्या. या सोप्या नियमाचे पालन करून, तुम्ही तुमच्या घरातील संपत्ती आणि सुख कायमचे टिकवून ठेवू शकता.
हेही वाचा :
कलियुगात माणसाचा स्वभाव कसा बदलत जाईल? कलियुगाचा अंत व्हायला किती वेळ शिल्लक? शिवपुराणातील उल्लेख जाणून थक्क व्हाल
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)