मुंबईच्या कांदिवलीत धक्कादायक घटना! प्रेम प्रकरणातून 17 वर्षीय तरुणीला संपवंल, आरोपी पोलिसांच्या ताब्यात


Kandivali Crime News : मुंबईच्या कांदिवलीत धक्कादायक घटना घडली आहे. प्रेम प्रकरणातून एका 17 वर्षीय तरुणीची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. कांदिवली पूर्वच्या समतानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही खळबळजनक घटना घडली आहे. दामूनगर जंगल परिसरात 17 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळला आहे. मृत तरुणीची ओळख पटली आहे. सिद्धी विश्वकर्मा (17 असं या मुलीचं नाव आहे. 

पोलिस, गुन्हे शाखा आणि फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी तपास सुरु केला

घटनेची माहिती मिळताच पोलिस, गुन्हे शाखा आणि फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी तपास सुरु केला आहे. सीसीटीव्ही, मोबाईल कॉल डिटेल्स, लोकेशन आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपीला ताब्यात घेतलं आहे. आरोपी सूरज वाघमारे (22), कांदिवली पूर्व येथील रहिवासी आहे. प्रेमसंबंध आणि लग्नाच्या वादातून हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आरोपीने चाकूने गळ्यावर वार करून हत्या केल्याचा पोलिसांचा दावा आहे. समतानगर पोलिसांनी आरोपीला अटक करुन पुढील तपास सुरु केला आहे. 

लातूरमध्ये अल्पवयीन शाळकरी मुलींची छेड, नागरिकांकडून तरुणाला बेदम मारहाण

लातूर शहरातील पीव्हीआर चौक परिसरात अल्पवयीन शाळकरी मुलींची छेड काढल्या मुळे एका तरुणाला संतप्त नागरिकांनी पकडून बेदम मारहाण केल्याची घटना घडली. त्यानंतर  तरुणाला मारहाण करतच एमआयडीसी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. दोन तरुणांकडून गेल्या काही दिवसांपासून अल्पवयीन शाळकरी मुलींची छेड काढणे आणि त्यांचा पाठलाग करणे सुरू असल्याचा प्रकार होत होता. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. त्या दोघांना पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी एक तरुण पळून जाण्यात यशस्वी झाला, तर दुसरा नागरिकांच्या हाती लागला. यानंतर संतप्त जमावाने त्या तरुणाला बेदम मारहाण केली होती.. पीव्हीआर चौक ते एमआयडीसी पोलीस ठाण्यात पर्यंत त्या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली.

शेतजमिनीच्या खरेदी-विक्रीच्या वादातून आटपाडी तालुक्यात हाणामारी

आटपाडी तालुक्यातील दिघंचीमध्ये शेतजमिनीच्या खरेदी-विक्रीच्या वादातून काल  सायंकाळी दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली होती. दोन गटांमधील हाणामारीचे आणि जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना कराव्या लागलेल्या सौम्य लाठीचार्जचे  व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. भर चौकात झालेल्या या राड्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला आणि जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्जही करावा लागला.  आटपाडी तालुक्यातील खवसपूर  हद्दीलगत पाच एकर शेतजमिनीच्या खरेदी-विक्रीच्या वादातून दोन गटांमध्ये सुरुवातीला शाब्दिक चकमक झाली आणि नंतर  त्याचे रूपांतर जोरदार हाणामारीत झाले. खवसपूर हद्दीलगत पाच एकर शेतजमिनीच्या खरेदी-विक्रीवरून वाद झाला. हा वाद मिटविण्यासाठी दोन्ही बाजूंतील व्यक्ती चर्चेसाठी एकत्र आल्या होत्या. सुरुवातीला चर्चेद्वारे तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू असतानाच अचानक दोन्ही गटांमध्ये पुन्हा शाब्दिक वाद झाला. काही क्षणांतच वातावरण तापले आणि वादाचे रूपांतर जोरदार हाणामारीत झाले. 

 

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *