Gautam Gambhir On Sanju Samson : संजू सॅमसनला संघातून वगळताच सगळे संतापले; गौतम गंभीर म्हणाला, ती गोष्ट कधीही बाहेर येणार नाही!


Gautam Gambhir Reaction On Sanju Samson Ind vs Eng T20 : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यातील लाजिरवाण्या पराभवानंतर भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर पुन्हा एकदा मीडियाच्या प्रश्नांच्या कचाट्यात सापडले आहेत. या सामन्यात 202 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ अवघ्या 76 धावांवर गारद झाला. या मोठ्या पराभवानंतर टी-20 वर्ल्ड कप 2026 मधील भारताच्या जेतेपदाचा नायक राहिलेल्या संजू सॅमसनला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवण्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. पत्रकार परिषदेत जेव्हा प्रशिक्षकांना याबद्दल प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्यांनी स्पष्ट केले की त्यांच्यात आणि सॅमसनमध्ये या निर्णयाबाबत पूर्ण स्पष्टता आहे, परंतु ते हे संभाषण जाहीर करणार नाहीत.

संजू सॅमसनबाबत काय म्हणाले गंभीर? (Gautam Gambhir Reaction On Sanju Samson)

आयर्लंडविरुद्धचे दोन सामने आणि इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात संजू सॅमसनची बॅट शांत राहिली होती. त्यानंतर व्यवस्थापनाने त्याला संघातून वगळून 15 वर्षांच्या तरुण खेळाडूला, वैभव सूर्यवंशीला संधी दिली. मात्र, सूर्यवंशीही आतापर्यंत आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली छाप पाडण्यात अपयशी ठरला आहे.

सॅमसनला बाहेर ठेवण्याच्या निर्णयाचे समर्थन करताना गौतम गंभीर म्हणाला की, “संजू सॅमसनला ज्या क्लॅरिटीची गरज होती, ती माझ्याकडून त्याला देण्यात आली आहे. हे संभाषण पूर्णपणे खेळाडू आणि मुख्य प्रशिक्षक यांच्यातील वैयक्तिक संभाषण आहे, जे कधीही बाहेर येणार नाही. संजूबाबत आमची भूमिका अगदी स्पष्ट आहे. त्याने भारतासाठी जे केले आहे ते अप्रतिम आहे, पण कधीकधी तुम्हाला खेळाडूचा सध्याचा फॉर्मही पाहावा लागतो. या मालिकेत तो पुनरागमन करू शकत नाही, असा कोणताही कडक नियम नाही.”

भारतीय संघ सातत्याने अपयशी

आंतरराष्ट्रीय क्रिकेट हे कोणत्याही एका वैयक्तिक खेळाडूभोवती फिरत नसून, योग्य संघ संयोजनावर चालते, यावर मुख्य प्रशिक्षकांनी भर दिला. मॅनेजमेंटला वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक शर्मा यांच्या सलामीच्या जोडीवर विश्वास होता, म्हणूनच हा बदल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, गंभीरने पराभवाचे खापर कोणत्याही एका खेळाडूवर फोडण्याऐवजी संपूर्ण संघाच्या सामूहिक अपयशाला जबाबदार धरले. या दौऱ्यावर आयर्लंडपासून इंग्लंडपर्यंत भारतीय फलंदाजी पूर्णपणे पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळताना दिसली आहे.

“आम्ही गेल्या 4 सामन्यांत चांगली क्रिकेट खेळलो नाही”

संघाच्या निवडीबाबत बोलताना गंभीर म्हणाले की, “आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा थेट संबंध निकालांशी असतो. जे कॉम्बिनेशन आपल्याला सर्वोत्तम निकाल देऊ शकते, त्याच प्लेइंग इलेव्हनसह आम्ही मैदानात उतरतो. माझे नेहमीच असे मत राहिले आहे की, प्रत्येक खेळाडूला भारतीय संघात आपले स्थान आणि खेळण्याचा अधिकार स्वतः कमावावा लागेल. जिथपर्यंत परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रश्न आहे, तर हे खरे आहे की आम्ही त्यात अपयशी ठरलो आहोत. आयर्लंड असो वा इंग्लंड, जर आम्ही चांगली क्रिकेट खेळलो असतो, तर कदाचित आम्हाला सलग चार सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला नसता.”

हे ही वाचा –

ENG vs IND 4th T20 : पहिल्या सामन्यात 14, दुसऱ्यात 13 धावा… वैभवचा निकाल नापास! पण तरी प्लेइंग-11 मधून नाही होणार बाहेर? टीम इंडियाच्या प्रयोगशाळेत बळी पडला संजू?



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *