Secrets Of Temple : पावसाच्या 7 दिवसआधीच मिळतात संकेत, मंदिराच्या दगडातून गळू लागतात पाण्याचे थेंब; आजही आहे ‘अनसॉल्व्ह मिस्ट्री’ | अध्यात्म बातम्या


Last Updated:

आपल्या देशात एक असे प्राचीन आणि चमत्कारी मंदिर आहे, जिथे हवामान खात्याच्या आधी साक्षात निसर्ग पावसाचा अचूक अंदाज वर्तवतो. पाऊस पडण्याच्या बरोबर 7 दिवस आधी या मंदिराच्या छतावरील दगडांमधून पाण्याचे थेंब टपकू लागतात.

News18
News18

Secrets Of Temple : भारतात हवामानाचा अंदाज लावण्यासाठी आज विज्ञान आणि सॅटेलाइट तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. पण, आपल्या देशात एक असे प्राचीन आणि चमत्कारी मंदिर आहे, जिथे हवामान खात्याच्या आधी साक्षात निसर्ग पावसाचा अचूक अंदाज वर्तवतो. पाऊस पडण्याच्या बरोबर 7 दिवस आधी या मंदिराच्या छतावरील दगडांमधून पाण्याचे थेंब टपकू लागतात. उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यात असलेले ‘जगन्नाथ मंदिर’ हे त्याच्या याच अद्भूत वेदर फोरकास्टिंग म्हणजेच हवामानाच्या अंदाजासाठी जगभर प्रसिद्ध आहे. स्थानिक शेतकरी पिढ्यानपिढ्या या मंदिराच्या इशाऱ्यावर आपल्या शेतीचे नियोजन करत आले आहेत. या मंदिराच्या छतावरील एक विशेष दगड आजही शास्त्रज्ञांसाठी एक मोठे गूढ आहे. हे मंदिर हवामान खात्यापेक्षाही लवकर आणि अधिक अचूकपणे हवामानाचा अंदाज वर्तवते. स्थानिक आणि दूरदूरचे भक्त याला देवाचा एक अद्वितीय आणि खरा चमत्कार मानतात.

काय आहे मंदिराचे वैशिष्ट्य?

कानपूरच्या घाटमपूर ब्लॉक अंतर्गत येणाऱ्या ‘बेहटा बुजुर्ग’ गावात हे ऐतिहासिक जगन्नाथ मंदिर वसलेले आहे. या मंदिराच्या गर्भगृहाच्या छतावर एक विशेष काळा दगड बसवण्यात आला आहे, जो पावसाळ्याचा अचूक संदेश देतो. या मंदिराचे सर्वात उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे, पावसाळा सुरू होण्याच्या सात दिवस आधी मंदिराच्या छतावरील दगडांवरून पाण्याचे थेंब टपकू लागतात. जेव्हा देशाच्या इतर भागांमध्ये प्रचंड उकाडा असतो आणि आकाशात एकही ढग नसतो, तेव्हा या मंदिराच्या गर्भगृहाचे छत ओलसर होते. दगडांवरून पाण्याचे थेंब असे पडतात, जणू काही खरोखरच पाऊस पडत आहे. हे अनोखे दृश्य पाहण्यासाठी दरवर्षी येथे गर्दी होते.

मान्सूनचा अंदाज

या मंदिराची भविष्य वर्तवण्याची पद्धतही खूप मनोरंजक आणि अचूक आहे. छतावरून पडणाऱ्या थेंबांचा आकार पाहून, लोक त्या वर्षी देशातील पावसाळ्याचा अंदाज लावू शकतात. जर दगडावरून पडणारे थेंब खूप मोठे असतील, तर त्या वर्षी मुसळधार पाऊस पडेल असा विश्वास आहे. जर पाण्याचे थेंब लहान आणि अनियमित असतील, तर लोकांना समजते की या वर्षी दुष्काळ पडेल किंवा खूप कमी पाऊस पडेल. त्याहूनही आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे, बाहेर आकाशात ढग जमायला लागून पाऊस सुरू होताच, मंदिराच्या छतावरून पडणारे पाणी पूर्णपणे थांबते.

हे मंदिर वरदानापेक्षा कमी नाही

हे मंदिर आजूबाजूच्या गावांतील शेतकऱ्यांसाठी एक वरदान आहे. ते हवामानाच्या अंदाजावर नव्हे, तर त्यांच्या जगन्नाथ मंदिरातील दगडांवर अवलंबून असतात. मंदिराच्या छतावरून पाण्याचे थेंब टपकत असताना, शेतकरी आपल्या शेतीच्या हंगामाची तयारी करू लागतात. ते आपली शेतं नांगरायला आणि बियाण्यांची व्यवस्था करायला सुरुवात करतात. शतकानुशतके चालत आलेला हा नैसर्गिक अंदाज कधीही चुकीचा ठरलेला नाही. त्यामुळे, लोक यालाच आपले खरे हवामान अंदाज केंद्र मानतात.

विज्ञानही ठरलं फेल

शास्त्रज्ञ आणि पुरातत्व पथकांनी हे रहस्य उलगडण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला आहे. हे पाणी कुठून येते हे निश्चित करण्यासाठी तज्ज्ञांच्या पथकांनी मंदिराच्या भिंती आणि छतांची तपासणी केली आहे. परंतु अनेक प्रयत्न करूनही, ढगांशिवाय खडकांमधून पाणी कसे पडते याचे उत्तर विज्ञानाला अजूनही सापडलेले नाही. मंदिराची रचना बौद्ध स्तूपासारखी असून त्याच्या भिंती खूप जाड आहेत. विज्ञान याला भौगोलिक घटना म्हणेल, पण भक्तांसाठी हा भगवान जगन्नाथांच्या असीम शक्तीचा जिवंत पुरावा आहे, जो आजही सर्वांना आश्चर्यचकित करतो.

टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

मराठी बातम्या/अध्यात्म/

पावसाच्या 7 दिवसआधीच मिळतात संकेत, मंदिराच्या दगडातून गळू लागतात पाण्याचे थेंब; आजही आहे ‘अनसॉल्व्ह मिस्ट्री’



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *