राज्यातील विविध भागात जोरदार पाऊस सुरू आहे. काही भागात रस्त्यांना नदीचं स्वरुप आलं आहे. वसईमध्ये रस्त्यावर जवळपास तीन फूट पाणी साचलं आहे. या पाण्यातून लोकांना वाट काढत चालावे लागत आहे. हवामान विभागाने कालनंतर आज देखील रेड अलर्ट जारी केला आहे. तर पावसांचं संकट सोमवारपर्यंत असणार असल्याचे सांगण्यात आलं आहे. मुंबई आणि जवळच्या शहरात झालेल्या पावसामुळे रेल्वे सेवेवरही परिणाम झाला आहे. मुंबईतील तिन्ही मार्गावरील लोकल ट्रेन उशिराने धावत आहेत. मुंबईत ठिकठिकाणी पावसाचं पाणी साचल्याने सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपही झाले. तर याच पावसात मुंबईच्या दादरमध्ये ठाकरे गटाचे आंदोलन होणार आहे. ठाकरे गट अयोध्या येथील कथिक गैरव्यवहाराच्या विरोधात दादरमध्ये रामरक्षा आंदोलन करणार आहे. यासह राज्यातील महत्वाच्या बातम्या, पावसाचे अपडेट्स, तसेच क्रीडा, मनोरंजन, राजकारण क्षेत्रातील महत्वाच्या बातम्यांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करायला विसरू नका.