Team India : टीम इंडियाच्या पुढील कसोटी सुपरस्टारचा शोध! श्रीलंका दौऱ्यापूर्वी BCCI चं मोठं पाऊल, बंगळुरूमध्ये युवा खेळाडूंची कसोटी


भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) भविष्यातील मजबूत कसोटी संघ तयार करण्याच्या दिशेने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. उदयोन्मुख युवा खेळाडूंना रेड-बॉल क्रिकेटसाठी तयार करण्याच्या उद्देशाने बीसीसीआयने इमर्जिंग मेन्स टूर्नामेंट (Emerging Men’s Tournament) आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या भारतीय संघाच्या श्रीलंका दौऱ्यापूर्वी ही चार दिवसीय स्पर्धा खेळवली जाणार आहे.

सध्याच्या काळात आयपीएल (IPL) आणि टी-20 क्रिकेटमुळे युवा खेळाडूंना खूप लवकर प्रसिद्धी आणि संधी मिळत आहे. मात्र, बीसीसीआयला आता अशा खेळाडूंवर लक्ष केंद्रित करायचे आहे जे कसोटी क्रिकेटमध्ये भारताचे भविष्य बनू शकतात. या स्पर्धेत निवडकर्त्यांची नजर खेळाडूंचे तांत्रिक कौशल्य, संयम आणि त्यांची फिटनेस यावर असणार आहे. या स्पर्धेत चार संघ सहभागी होतील आणि प्रत्येक संघ तीन चार दिवसीय सामने खेळेल. सर्व सामने बंगळूरु येथील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्स (CoE) मध्ये आयोजित केले जातील. संपूर्ण स्पर्धेदरम्यान निवड समिती खेळाडूंचे तांत्रिक कौशल्य, सहनशक्ती आणि तंदुरुस्तीवर लक्ष ठेवेल.

युवा कर्णधारांवर मोठी जबाबदारी

या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या चारही संघांचे नेतृत्व देशांतर्गत क्रिकेट आणि अंडर-13 स्तरावर चमकदार कामगिरी करणाऱ्या युवा खेळाडूंकडे सोपवण्यात आले आहे. उदय सहारनने 2024 च्या 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व केले होते आणि अलीकडेच त्याने पंजाब संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. 2022 चा 19 वर्षांखालील विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा कर्णधार यश धुल होता. कर्नाटकचा फलंदाज स्मरण रविचंद्रन देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आहे, तर कोडिमेला हिमतेजा हा देखील उदयोन्मुख खेळाडूंपैकी एक आहे.

संघ अ – उदय सहारन (कर्णधार)
संघ ब – स्मरण रविचंद्रन (कर्णधार)
संघ क – यश धुल (कर्णधार)
संघ ड – कोडिमेला हिमतेजा (कर्णधार)

दिग्गज प्रशिक्षकांचे लाभणार मार्गदर्शन

युवा खेळाडूंना तांत्रिक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी भारताच्या माजी क्रिकेटपटूंवर प्रशिक्षकपदाची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

संघ अ – वसीम जाफर (मुख्य प्रशिक्षक), सौराशीष लाहिरी (सहाय्यक प्रशिक्षक)
संघ ब – रमेश पोवार (मुख्य प्रशिक्षक), अंशु जैन (सहाय्यक प्रशिक्षक)
संघ क – विनीत सक्सेना (मुख्य प्रशिक्षक), सिद्धार्थ त्रिवेदी (सहाय्यक प्रशिक्षक)
संघ ड – देबाशीष मोहंती (मुख्य प्रशिक्षक), विनीत इंदुलकर (सहाय्यक प्रशिक्षक)

बीसीसीआयचा नेमका उद्देश काय?

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांसारख्या दिग्गज खेळाडूंच्या कारकिर्दीच्या उत्तरार्धानंतर भारतीय कसोटी संघ सध्या एका संक्रमण काळातून जात आहे. अशा परिस्थितीत निवडकर्त्यांसाठी ही स्पर्धा अत्यंत महत्त्वाची ठरेल. भारताला भविष्यातील सलामीवीर, मधल्या फळीतील फलंदाज, दर्जेदार वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटू मिळवून देण्याच्या दृष्टीने हे बीसीसीआयचे एक मास्टरस्ट्रोक पाऊल मानले जात आहे.

हे ही वाचा –

Ind vs Eng 2nd T20 Live Update : पहिल्या विजयासाठी श्रेयस अय्यर सज्ज; भारत-इंग्लंड दुसरा टी-20 आज, वैभव सूर्यवंशीच्या पदार्पणाकडेही चाहत्यांचे लक्ष



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *