‘सनई चौघडे’मध्ये मोठा ट्विस्ट; जयला होणार चुकीचा पश्चात्ताप, शरुला आणणार परत – Marathi News | Major twist in sanai chaughade serial sharu will change jay perception about females chinmayee salvi raj hanchnale


राज हंचनाळे, चिन्मयी साळवीImage Credit source: Instagram

झी मराठी वाहिनीवरील ‘सनई चौघडे’ ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे. या मालिकेत आता कथेला नवं वळण मिळणार आहे. गैरसमज, नात्यांतील तणाव आणि त्यातून होणारी जाणीव यामुळे मालिकेत मोठे बदल घडताना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. जेलमधून सुटल्यानंतर शरू जयसाठी स्वागताची तयारी करतेय. मात्र, आपल्या आयुष्यात घडलेल्या सर्व घटनांसाठी जय महिलांनाच जबाबदार धरतो. रागाच्या भरात तो आपल्या कार्यालयातील सर्व महिला कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकतो. जयच्या या निर्णयामुळे शरू खूप दुखावली आहे.

गौतम जयसमोर सर्व सत्य आणतो. जयला वाचवण्यासाठी शरूने स्वतःच्या सन्मानाचीही पर्वा केली नाही. शरूच्या संघर्षाची जाणीव होताच जयला आपल्या चुकीचा पश्चात्ताप होणार आहे. तो सर्व महिला कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा कामावर रुजू करून घेणार आहे. दुसरीकडे, परब कुटुंबात आसावरीच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. गौतम जबाबदार आणि स्वतःच्या पायावर उभा राहावा अशी सुभाषची इच्छा आहे. त्यासाठी तो गौतमची परीक्षा घेण्याचं ठरवतो. दरम्यान, प्रॉडक्ट सर्व्हेदरम्यान शरू जयला सामान्य लोकांशी कसं जोडलं जावं हे शिकवते. त्याचा दृष्टिकोन बदलण्यास ती मदत करते. याच वेळी एक वयोवृद्ध जोडपं त्यांना नवरा-बायको समजतात. त्या जोडप्याच्या बोलण्यामुळे जयला शरूमुळे आपल्या आयुष्यात झालेला सकारात्मक बदल जाणवतो.

पहा प्रोमो-

आता शरू आणि जयच्या नात्याला नवी दिशा मिळणार का? जयचा हा बदल कायम राहणार का? गौतम स्वत:च्या पायावर सक्षमपणे उभा राहू शकेल का? या सर्व प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात मिळतील. ‘सनई चौघडे’ ही मालिका दररोज रात्री 8.30 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘सनई चौघडे’ ही मालिका पहिल्याच भागापासून प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. लालबाग परळ मधील हे मध्यमवर्गीय कुटुंब लोकांना भावतं आहे. म्हणून मालिका सुरू होताच पहिल्याच आठवड्यात टॉप 10 मालिकांच्या यादीत ‘सनई चौघडे’नं स्थान मिळवलं होतं. कथानकातील वेगळेपणा आणि भावनिक गुंतवणूक आणि स्वामींचा आशीर्वाद यामुळे प्रेक्षकांकडून मालिकेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. जय आणि शरू यांच्यातील केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडत आहे.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *