प्रवीण तरडेंच्या ‘देऊळ बंद 2’ नं 100 कोटींचा टप्पा ओलांडला, अभिनेता प्रसाद ओकची लय भारी पोस्ट, म्हणाला…


Deool Band 2: ‘देऊळ बंद 2’ (Deool Band 2) या सिनेमाचा जगभरात जयजयकार होताना दिसत आहे. या सिनेमाला अल्पावधीतच लोकप्रियता मिळाली.  चित्रपटाच्या रेकॉर्डमध्ये आणखी एक भर पडली आहे. ‘देऊळ बंद 2’ या सिनेमानं 100 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. ‘राजा शिवाजी’ (Raja Shivaji) या सिनेमानंतर ‘देऊळ बंद 2’ हा सिनेमा 100 कोटींचा टप्पा ओलांडणारा  चित्रपट ठरला आहे. अवघ्या 10 कोटींमध्ये तयार झालेल्या या सिनेमाने 100 कोटींचा टप्पा ओलांडल्यामुळे अनेक सेलिब्रिटींकडून ‘देऊळ बंद 2’च्या टीमचं विशेष कौतुक होत आहे. अलिकडेच मराठी अभिनेता  प्रसाद ओकने (Prasad Oak) या सिनेमाच्या टीमचं कौतुक करत प्रवीण तरडे यांचंही कौतुक केलं आहे. 

प्रसाद ओक यांनी प्रवीण तरडेंचं कौतुक केलं (Deool Band 2 Crosses 100 crore worldwide collection)

प्रसाद ओक हा ‘देऊळ बंद 2’ या सिनेमाचा भाग आहे.  त्यानं या सिनेमात लहान पण प्रभावी भूमिका साकारली आहे.  त्यांनी इन्स्टाग्रामवर एक लाइव्ह व्हिडीओ शेअर केला आहे.  प्रसाद ओक व्हिडीओत म्हणाले की, ‘नमस्कार,  ‘देऊळ बंद 2’   या सिनेमानं 100 कोटींचा यशस्वी टप्पा पार केला आहे.  ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. या सिनेमाचे लेखक दिग्दर्शक प्रवीण तरडेचं विशेष अभिनंदन. केवळ आपल्या महाराष्ट्रातून नाही तर जगभरातून या सिनेमाला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे’.

‘गेले 40 दिवसांपासून या सिनेमानं उत्तम कामगिरी केली आहे. मराठी सिनेसृष्टीला सुगीचे दिवस आले आहेत, असं आपण म्हणू शकतो. ‘राजा शिवाजी’ या सिनेमानं  130 कोटींचा टप्पा पूर्ण केला आहे.  ‘तुंबाडची मंजुळा’ हा सिनेमा देखील बॉक्स ऑफिसवर उत्तम चालला. ‘घबाडकुंड’लाही चांगलं यश मिळालेलं आहे.  आता ‘देऊळ बंद 2′ या सिनेमाला यश मिळत आहे. मला असं वाटतं, प्रवीण तरडे याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे’.

‘आजपर्यंत त्याच्यावर माता सरस्वती आणि माता लक्ष्मी प्रसन्न होत्याच, पण आता त्याच्या पाठीशी श्री स्वामी समर्थ देखील ठामपणे उभे आहेत.  आता प्रवीण तरडेला कसलीच चिंता नाही. आता प्रवीण तरडे पुढची 50 वर्षे तरी मागे वळून बघणार नाही, एवढं मात्र नक्की. प्रवीण तरडेनं हा सिनेमा हाल – अपेष्टा सहन करुन हा सिनेमा साकारला आहे.  मी या सिनेमाचा भाग आहे.  त्यामुळे त्याने काय काय सोसलंय हे मी पाहिलंय.  पावसामुळे त्याचं काय काय नुकसान झालं आहे. त्याला कसं थांबायला  लागलं, हे आम्ही जवळून पाहिलंय. प्रवीणने अत्यंत प्रामाणिकपणे श्री स्वामी समर्थ यांच्यावर निष्ठा ठेवून हा सिनेमा साकारला आहे.  त्यामुळे हा सिनेमा एवढं यश पाहतो आहे’, असं म्हणत प्रसाद ओक यांनी प्रवीण तरडेंचं कौतुक केलंय. 

‘आमच्या पिढीतील माझ्या माहितीतील प्रवीण हा असा एकमेव दिग्दर्शक आहे,  ज्याने बॅक 2 बॅक सिनेमे तयार करुन  ते सक्सेसफूल करुन दाखवले आहेत. ‘धर्मवीर’पासून तू सिनेमांसाठी किती मेहनत घेतो आहेस, हे मी जवळून पाहिलं आहे.   ‘देऊळ बंद 2’साठी तू तितकेच कष्ट घेतलेस, रात्रभर जागा राहिला असशील.  याचसाठी श्री स्वामी समर्थ यांनी तुझ्या पदरात  मोठं यश टाकलं आहे. प्रवीण  मित्रा, असंच काम करत राहा. देऊळ बंद 2 टीमचं मनापासून अभिनंदन’, असं प्रसाद ओक म्हणाले.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

‘आश्रम’मध्ये बॉबी देओलसोबत इंटिमेट सीन्स, लिप-लॉक अन्…; ‘नको त्या सीन्स’मुळे अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडनं नातंच तोडलं



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *