ECI SIR process: देशभरात मतदार याद्यांचे एसआयआर म्हणजे पुनर्निरीक्षण करण्याची घोषणा झाली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. तर विरोधकांना टोलाही लगावला आहे. ते नेमकं काय म्हणाले जाणून घेऊयात.

फडणवीस म्हणाले की, “मी स्वतः 2012 साली उच्च न्यायालयात गेलो होतो. तेव्हा मी ही मागणी केली होती की मतदार याद्यांचे संपूर्ण पुनर्निरीक्षण झाले पाहिजे. मागील 25 वर्षांपासून केवळ संक्षिप्त पुनरनिरीक्षण चालू होते, पण संपूर्ण पुनरावलोकन होत नव्हते. त्यामुळे एसआयआर प्रक्रिया अत्यंत गरजेची होती. आता ती देशभर राबविली जाणार असल्याने मला खूप समाधान वाटते.”
Nanded News: ‘मंगल माझ्याशी लग्न कर!’; दहा वर्ष मोठ्या प्रेयसीशी करायचे होते लग्न, नकार मिळाल्याने घेतला जीव, नांदेडमध्ये खळबळ
त्यांनी पुढे सांगितले की, “एसआयआर प्रक्रियेनंतर मतदार याद्या ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित करण्यात याव्यात. यामुळे पारदर्शकता आणि सुरक्षितता वाढेल. एखाद्या मतदाराने राज्य बदलले तरी त्याचा आयडी दुसऱ्या ठिकाणी कायम राहील, अशी सुसंगत प्रणाली तयार होणे आवश्यक आहे.” फडणवीस यांनी हेही नमूद केले की, ही प्रक्रिया झाल्यास मतदार नोंदीतील त्रुटी कमी होतील आणि मतदार यादी अधिक विश्वसनीय बनेल.
या घोषणेच्या विरोधात विरोधक मोर्चा काढण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळताच, फडणवीस यांनी विरोधकांवर तीव्र टीका केली. त्यांनी म्हटले, “विरोधक हे पूर्णपणे निराश झाले आहेत. त्यांना आधीच माहिती आहे की येणाऱ्या निवडणुकीत त्यांचा पराभव निश्चित आहे. त्यामुळे पराभव झाकण्यासाठी ते ‘कव्हर फायर’ करत आहेत.”
“ज्यांची नोट चोरी बंद झाली आहे, ते आता वोट चोरीचा आवाज लावत आहेत. पण हे लक्षात ठेवा, ‘ये पब्लिक है, सब जानती है.’ जनतेला सर्व काही कळते आणि ती चुकीच्या प्रचाराला बळी पडणार नाही.” असा टोला फडणवीसांनी विरोधकांना लगावला.
दरम्यान, फलटण आत्महत्येच्या प्रकरणावरून काँग्रेस नेते राहुल गांधींनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना फडणवीसांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, “राहुल गांधी जे ट्वीट करतात ते त्यांना स्वतःलाच समजत नाहीत. त्यांना घटनेची संपूर्ण माहिती नसते. फलटण येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणात तिने आपल्या हातावर लिहून ठेवले आहे, त्यामुळे प्रकरण स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात कुणालाही क्षमा दिली जाणार नाही.”
सगळं लुटलं, स्वप्न उद्ध्वस्त… सराफाच्या फसवणुकीनं महिलांच्या डोळ्यात अश्रू!
फडणवीसांनी काँग्रेसवर टीका करताना म्हटले की, दुर्दैवाने राहुल गांधी आणि त्यांच्या पक्षातील लोक संवेदनशील घटनांमध्येही राजकारण करण्याची संधी सोडत नाहीत.या प्रकारच्या संवेदनशील घटनेतही पोळ्या भाजणं विसरत नाही, हे फार मोठ दुर्दैव आहे.
