Last Updated:
पावसाळ्यात केस धुतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ते तेलकट, निस्तेज आणि अस्वच्छ होतात. पावसाळ्यात तेलकट दिसत असलेल्या केसांमुळे मूड खराब होऊ देऊ नका, त्यासाठी सौंदर्य तज्ज्ञ शहनाज हुसेन यांनी सांगितलेल्या टिप्स वापरुन पाहा.
मुंबई : पावसाळा सुरु झालाय. पावसाळ्यात केसांची काळजी घेण्यासाठी काही टिप्स उपयुक्त ठरतील.
पावसाळ्यात केस धुतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ते तेलकट, निस्तेज आणि अस्वच्छ होतात. पावसाळ्यात तेलकट दिसत असलेल्या केसांमुळे मूड खराब होऊ देऊ नका, त्यासाठी सौंदर्य तज्ज्ञ शहनाज हुसेन यांनी सांगितलेल्या टिप्स वापरुन पाहा.
हवेतील आर्द्रतेचा परिणाम त्वचेबरोबरच केसांवर आणि टाळूवरही होतो. आपल्या टाळूमधे नैसर्गिक तेल म्हणजेच सेबम तयार करणाऱ्या लहान ग्रंथी असतात. हे तेल केसांना निरोगी आणि ओलसर ठेवण्यास मदत करतं. पण अतिरिक्त आर्द्रतेमुळे या ग्रंथी अधिक तेल तयार करू शकतात, ज्यामुळे केस अधिक लवकर तेलकट आणि चिकट होतात.
डोक्याला जास्त घाम येणं – पावसाळ्यात उष्णता आणि आर्द्रता वाढते, ज्यामुळे डोक्याला घाम येऊ शकतो. घाम आणि तेल मिसळतात, तेव्हा केसांवर एक चिकट थर तयार होतो, ज्यामुळे केस लवकरच जड, अस्वच्छ आणि तेलकट दिसू लागतात.
धूळ आणि प्रदूषणाचे परिणाम – पावसाळ्यात धूळ आणि प्रदूषणही मोठ्या प्रमाणात असतं. ही धूळ घामानं भिजलेल्या आणि तेलकट केसांना सहज चिकटते, ज्यामुळे केस अस्वच्छ आणि जड दिसू लागतात.
बुरशी आणि टाळूच्या समस्या – पावसाळ्यात बुरशी आणि जीवाणूंच्या वाढीसाठी पोषक वातावरण असतं, ज्यामुळे कोंडा, खाज आणि जळजळ यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. यामुळे टाळूमधे जास्त तेल तयार होतं, ज्यामुळे केस तेलकट होतात. ज्यांचे केस पातळ असतात, त्यांना ही समस्या अधिक जाणवते. कारण पातळ केस टाळूच्या जवळ असल्यामुळे, तेल संपूर्ण केसांमधे अधिक वेगानं पसरतं, ज्यामुळे केस तेलकट दिसतात.
पावसाळ्यात केसांचा चिकटपणा कमी करण्याचे सोपे उपाय पाहूया –
टाळू स्वच्छ करण्यासाठी कडुलिंबाच्या पाण्यानं केस धुवा.
टाळूला आराम देण्यासाठी आणि संतुलन राखण्यासाठी ताज्या कोरफडीचा गर लावा.
आवळा आणि रीठा यांसारख्या हर्बल क्लीन्झर्सचा वापर करा.
खूप दमट दिवसांमधे केसांना जास्त तेल लावणं टाळा.
केस धुतल्यानंतर ते पूर्णपणे कोरडे करा; केसांमधे ओलावा राहणार नाही याची काळजी घ्या.
Mumbai,Maharashtra
Jun 25, 2026 10:36 PM IST
