प्रेम विवाह किंवा घरच्यांनी ठरवून दिल्यानंतर दोन व्यक्ती लग्नबंधनात अडकतात. प्रेमविवाहात एकमेकांना ओळखून लग्नाचा निर्णय घेतला जातो. तर अरेंज मॅरेजमध्ये घरच्यांच्या संमतीसह एकमेकांची ओळखपालख करून लग्नाचा निर्णय घेतला जातो. असं असताना लग्नानंतर कधीच आपल्या पार्टनरला लग्न करून पश्चाताप झाला असं म्हणू नये. रागाच्या भरात बोलून गेलेलं हे वाक्य नकारात्मक परिणाम करतात. त्यामुळे नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो.