Karnataka Congress: कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेवर मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्पष्टीकरण दिले. अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील, असे ते म्हणाले. रणदीप सिंह सुरजेवाला आमदारांशी चर्चा करणार आहेत. सिद्धरामय्या यांनी डी. के. शिवकुमार यांच्याशी चांगले संबंध असल्याचे सांगितले. भाजपने खर्गे यांच्यावर टीका केली. म्हैसूर दसरा उत्सवाच्या मुद्द्यावरून सिद्धरामय्या यांनी भाजपवर पलटवार केला.

राज्यात ऑक्टोबरमध्ये मुख्यमंत्री बदलण्याचा दावा काही पक्षनेत्यांकडून केला जात आहे. याबाबत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना खर्गे यांनी हे स्पष्टीकरण दिले. ‘मुख्यमंत्रीबदलाचा निर्णय पक्षश्रेष्ठींच्या अखत्यारित आहे. त्यांच्यामध्ये याबाबत काय विचारमंथन सुरू आहे, हे इथे कोणीही सांगू शकत नाही. याबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठींवर सोपावण्यात आला असून, पुढील कार्यवाहीचा अधिकार त्यांचा आहे. त्यामुळे कोणीही अनावश्यकपणे समस्या निर्माण करू नये’, असे खर्गे म्हणाले. कर्नाटकात २०२३मध्ये काँग्रेस सत्तेत आल्यानंतर सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार हे प्रत्येकी अडीच वर्षांसाठी राज्याचे नेतृत्व करतील अशी चर्चा होती. मात्र, पक्षाने आत्तापर्यंत यासंदर्भात अधिकृत पुष्टी दिलेली नाही किंवा ही शक्यता नाकारलेलीदेखील नाही.
Karnataka Congress: सरकारच्या कामावर आमदार नाराज, करनाटक मध्ये नेतृत्वबदलाचे वारे?
सुरजेवाला यांच्याकडून भेटीगाठी
कर्नाटकमधील सत्ताधारी पक्षातील असंतोष आणि नेतृत्वबदलाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकचे प्रभारी रणदीप सिंह सुरजेवाला यांनी सोमवारी इथे पक्षाच्या आमदारांसोबत बैठका सुरू केल्या. तीन दिवसांच्या दौऱ्यात सुरजेवाला बहुतेक आमदारांसोबत वैयक्तिकरित्या चर्चा करण्याची शक्यता आहे. ते आमदारांच्या तक्रारी ऐकतील व सरकारच्या कार्यपद्धतीबाबत अभिप्राय जाणून घेतील, असे सूत्रांनी सांगितले.
भाजपचा नवा अध्यक्ष ठरला? निवड ऐतिहासिक ठरणार, ‘मामां’ना मागे टाकून नवा चेहरा आघाडीवर
सिद्धरामय्या यांनी व्यक्त केला विश्वास
‘उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याशी माझे मधुर संबंध असून, राज्यातील काँग्रेस सरकार पाच वर्षे मजबूत राहील’, असा विश्वास कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सोमवारी व्यक्त केला. या वर्षाच्या अखेरीस राज्यात नेतृत्वबदल होण्यासंदर्भात नव्याने सुरू असलेल्या अटकळींवर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. यावर्षी जगप्रसिद्ध म्हैसुरू दसरा उत्सवाचे उद्घाटन करण्याची संधी सिद्धरामय्या यांना मिळणार नाही, असा दावा भाजप नेत्यांकडून केला जात आहे. यावर बोलताना, भाजपचे नेते खोटे बोलण्यात पटाईत असल्याची टीका सिद्धरामय्या यांनी केली.