भारतीय संघाने नुकतीट इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिका खेळली. जी भारतीय संघाने गमावली. मालिका गमावली पण एकही सामना जिंकता आला नाही याची जास्त खेद आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारतीय संघ आता नवीन बदलातून जात आहे. नवीन निर्णयांमुळे, नवीन चेहऱ्यांमुळे भारतीय संघाच्या कामगिरी अनेक परिणाम होताना दिसत आहे. भारतीय संघाने आता टी-20 मालिका गमावल्यामुळे अनेक लोकांनी टीका करायला सुरुवात केली पण त्यातील एका टीकेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
टीम इंडियासाठी डेब्यू करणाऱ्या प्रिन्स यादवने इंग्लंडमध्ये चांगली कामगिरी केलेली आपण सगळ्यांनीच पाहिली. वरूण चक्रवर्तीच्या बाबतीत देखील असंच घडलेले दिसले पण तुम्हाला बुमराहशिवाय काही दुसरा ऑप्शनच मिळत नाही ना, असं म्हणत त्यांनी बॉलिंग लाईनअप टीका केली. आणखी एक म्हणजे भुवनेश्वर कुमार अजूनही रिटार्ड झाला नाही.” तर कृष्णम्माचारी श्रीकांत यांच्या मते ही पूर्णपणे टीम इंडियाने पूर्णपणे मुंबईची लॉबी भरलीये. याचा परिणाम म्हणून भारतीय संघाने टी-20 मालिका गमावली आहे.
आता भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध वनडे मालिका खेळणार आहे. या मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. पहिला सामना आज दुपारी खेळवला जाणार आहे ज्याचे नाणेफेक हे तीन वाजता होणार आहे. या मालिकेत एकूण तीन सामने असणार आहे. बऱ्याच वेळेनंतर आता रोहित शर्मा आणि विराट कोहली एकत्र मैदानात उतरलेले पाहायला मिळतील. अफगाणिस्तानविरुद्ध मालिकेत फक्त रोहित शर्मा खेळताना दिसला होता, विराट कोहली या मालिकेदरम्यान दुखापतीशी झुंज देत होता. आता तो बरा झाला आहे आणि या मालिकेतून तो पुन्हा एकदा मैदानात उतरत आहे.