Lock Upp 2 : गरिबांनी मुलं पैदा केल्यासा गरिबी वाढेल, पण श्रीमंतांनी…, उद्योजकाच्या बायकोचं वादग्रस्त वक्तव्य – Marathi News | Lock Upp 2 ashneer grover wife madhuri jain controversial statement poor children increase poverty


Lock Upp 2 : गरिबांच्या मुलांमुळे गरिबी वाढेल, पण श्रीमंतांच्या मुलांमुळे श्रीमंती वाढते… असं वक्तव्य माधुरी जैन हिने केलं आहे. जी उद्योजक अश्नीर ग्रोवर याची पत्नी आहे. ‘लॉक अप 2’ मध्ये माधुरी हिने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सर्वत्र संतापाचं वातावरण आहे. माधुरी हिने केलेलं वक्तव्य कोणालाच आवडलेलं नाही. त्यानंतर स्वतःचा बचाव करण्यासाठी माधुरी आणि तिचे पती अश्नीर यांना तिसरं मुल हवं होतं. पण कुटुंबियांनी पाठिंबा नसल्यामुळे आणि काही मेडीकल अडचणींमुळे त्यांना तिसऱ्या मुलाचं जगात करता आलं नाही…

मात्र, या वादाचे मूळ कारण ही बाब नसून त्यानंतर माधुरीने उच्चारलेले शब्द होते, ज्यांनी अनेकांना धक्का दिला. माधुरी म्हणाली, “तिसरं अपत्य तुम्हाला तरुण ठेवतं. जर तुम्ही श्रीमंत लोकांकडे पाहिलं, ज्यात शाहरुख खानचाही समावेश आहे, तर त्यांना तिसरं अपत्य आहे. ‘हम दो हमारे दो…’ ही म्हण सर्वांनाच लागू पडत नाही. श्रीमंत लोकांना जितकी जास्त मुले असतात, तितकी त्यांची संपत्ती वाढते; तर गरिबांना जितकी जास्त मुले असतात, तितकी त्यांची गरिबी वाढते.” या वक्तव्यानंतर वाद निर्माण झाला.

माधुरी जैन ग्रोव्हर हिच्या विधानावर तीव्र टीका

माधुरीच्या या वक्तव्यावर अनेकांनी असहमती दर्शवली आहे. एका नेटकरी तिव्र शब्दात टीका करत म्हणाला, “स्पष्टच आहे की, या महिलेला अर्थव्यवस्था किंवा लोकसंख्येबाबत काहीही ज्ञान नाही. यावरून हेच ​​दिसून येतं की, उच्चभ्रू वर्गाकडे किती मूलभूत माहितीचा अभाव असतो. लक्षात ठेवा, सामान्य जनताच यांसारख्या लोकांना मत करते.”, दुसरा नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘माधुरी अश्नीर ग्रोवर यांच्या किव येते, त्यांचं हे वक्तव्य श्रीमंतांच्या घमंडीचं सर्वात वाईट रुप आहे. त्यांचे विचार त्यांच्या बॅक बॅलेन्सपर्यंत मर्यादित आहेत. तर, श्रीमंतांकडून होणारं शोषण ही कधीच समस्या नसते; समस्या असते ती केवळ गरिबांचं अस्तित्व…

‘लॉक अप 2’ (Lock Upp 2) बद्दल सांगायचं झालं तर, रिअ‍ॅलिटी शोच्या नुकताच झालेल्या एका भागात, अभिनेत्री कंगना राणौतने विशेष पाहुणी म्हणून हजेरी लावली. तिने स्पर्धकांना खडे बोल सुनावले आणि त्यांना आपली कामगिरी सुधारण्याचं आवाहन केलं. दरम्यान, श्रेष्ठा अय्यर स्पर्धेतून बाहेर पडली; ‘लॉक अप 2’ मधून बाहेर पडणारी ती पहिली स्पर्धक ठरली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *