Sar Tan Se Juda controversy : ज्या शाळेत वाजले ‘सर तन से जुदा’, ती पाडावी लागेल, भाजपा नेते किरीट सोमय्या काय म्हणाले – Marathi News | Demolish that school in Partur, Jalna district; Kirit Somaiya and the ‘Sar Tan Se Juda’ controversy.


जालना जिल्ह्यातील परतूर येथील एका खाजगी शाळेतील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर हंगामा झाला आहे. या व्हिडीओ शाळेच्या वार्षिक कार्यक्रमात मुले परफॉर्म करताना दिसत आहेत. काही मुले हातात नकली तलवारी घेऊन ‘सर तन से जुदा’ या गाण्यावर नृत्य करताना दिसत आहे. हे गाणे वाजल्याने या प्रकरणात शाळेवर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात काल भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी पोलिसांच्या सोबत या शाळेचा दौरा केला. त्यानंतर किरीम सोमय्या यांनी ही शाळा सरकारी जमीनीवर उभी असून ती बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे.

मूळ गीत पाकिस्तान शायरने लिहिलेले

शाळेची पाहणी केल्यानंतर किरीट सोमय्या यांनी दावा केला की या शाळेकडे शिक्षण विभागाची अधिकृत मान्यता नाही आणि नियमानुसार या शाळेच्या इमारतीला पाडावे लागेल. या शाळेत ‘सर तन से जुदा’ गीतावर नृत्यू केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी या शाळेत झालेल्या या गीताच्या निवडीवर आक्षेप घेतले. त्यानंतर पोलिसांना या शाळेवर कारवाई केली आहे. परतूर पोलिसांना या प्रकरणात शाळेचे अध्यक्ष, एक शिक्षक आणि कार्यक्रमाच्या सूत्रसंचालक अशा तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात दाखल एफआयआर नुसार काही बाबी वादग्रस्त ठरल्या आहेत. हे मूळ गीत पाकिस्तान शायरने लिहिलेले आहे. या गीताची निवड एका शिक्षकाने केली होती आणि त्याच्या नेतृत्वाखाली हा डान्स बसवण्यात आला होता. या प्रकरणातील उपलब्ध पुराव्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.

हे सहन केले जाणार नाही

किरीट सोमय्या यांनी पोलिसांच्या सोबत या शाळेची पाहणी केली. त्यांनी शाळेच्या परिसराची पाहणी केली. कागदपत्रांची पाहणी केली. शाळेला भेट दिल्यानंतर किरीट सोमय्या यांनी मीडियाशी बोलताना सांगितले की या शाळेला शिक्षण विभागाची रितसर मान्यता नाही.शाळेला सील करुन पुढील कारवाई करण्यात येत आहे.या प्रकरणात अशा प्रकारचे गीत वाजवले जाणे चुकीचे असून हे सहन केले जाणार नाही.महाराष्ट्रात भाजपाचे सरकार आहे. शाळेत अशाप्रकारे पाकिस्तानचे गीत वाजवणे सहन केले जाणार नाही. बांगलादेशी आणि पाकिस्तानी तसेच अतिरेक्यांचे समर्थन करणाऱ्याच्या विरोधात कठोर कारवाई केली जाईल. त्यांनी उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांचे या प्रकरणात काय मत आहे, विरोधी पक्षाचे अशा घटनेत शांत बसणे चुकीचे असल्याचेही सोमय्या यांनी यावेळी म्हटले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *