ओमराजेंना शेवटपर्यंत जपण्याचा प्रयत्न केला, आदल्या रात्री काय काय केलं? ठाकरेंनी पहिल्यांदाच सगळं सांगितलं – Marathi News | Uddhav Thackeray strongly criticizes on Omraje Nimbalkar Makes a big revelation


शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. राज्यात काही दिवसांपूर्वीच ऑपरेश टायगर झालं, शिवसेना ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी बंडखोरी केली. या खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. ज्या-ज्या मतदारसंघात बंडखोरी झाली, त्या -त्या मतदारसंघात आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे दौरा करत आहेत. आज ते शिवसेना ठाकरे गटाचे बंडखोर खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत, त्यांनी धाराशिवमध्ये सभा घेतली. या सभेमध्ये बोलताना त्यांनी ओमराजे निंबाळकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे? 

जेव्हा मी खासदारांची बैठक बोलावली होती, तेव्हा मला यांनी न येण्याची वेगवेगळी कारणं दिली होती. तेव्हा मी यांना म्हटलो नका येऊ. मात्र जेव्हा यांचे चेहरे मला व्हिडीओमध्ये दिसायला लागले, तेव्हा मी ओमराजे निंबाळकरांना विचारलं, तुमचा चेहरा बरोबर दिसत नाहीये. तुमच्यावर काही तणाव आहे का? की रात्री झोप झालेली नाहीये? तेव्हा ते म्हणाले नाही माझं सगळं बरोबर आहे, मी ठीक आहे, तेव्हाच माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली, वाटलं काही तरी गडबड आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, ओमराजे निंबाळकर यांना जपण्याचा प्रयत्न मी शेवटपर्यंत केला. खोट कशाला सांगू? अगदी खासदार फुटण्याच्या आदल्या रात्री, मध्यरात्री दीड वाजता, मी कैलास पाटील आणि वरून सरदेसाई यांना त्यांना भेटण्यासाठी पाठवलं होतं, मी त्यांना हे देखील म्हणालो होतो, मला ओमराजे पाहिजे त्यांना खासदार पाहिजे आता निर्णय तुम्ही घ्यायचा आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी ओमराजे निंबाळकर यांच्यावर घणाघात केला आहे.  हरामाचा पैसा पाहिजे होता म्हणून गद्दार तिकडे गेला, 2022 ला सर्व गद्दारांना त्यांच्या माहेरी गुजरातला नेलं होतं, पण त्यावेळी  कैलास पाटील लाथ मारून परत आले होते. गद्दारांचं नेतृत्व करणाऱ्यांचं नशीब फिरल्याशिवाय राहणार नाही. मी तुमची माफी मागतो कारण मी जर त्याला उमेदवारी दिली नसतील तर तुम्ही त्याला मतदान केलंच नसतं, ही कीड वाढलीच नसती असंही यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे, तसेच ओमराजे निंबाळकर कपाळावरील हा गद्दारीचा डाग कसा पुसणार ? असा सवालही यावेळी ठाकरे यांनी केला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *